शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

तक्रारदारांचा आवाज दडपणे ही इंग्रजांपेक्षाही मोठी हुकूमशाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:47 IST

बॅलेट पेपरवरील निवडणुकांसाठी देशव्यापी आंदोलन

सातारा : ‘पारदर्शक निवडणुका प्रक्रिया राबवणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु, या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिला नाही. ईव्हीएमविरोधात तक्रार करणाऱ्या, बॅलेट पेपरसाठी ग्रामसभा घेणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्यांना न्यायालयाची अथवा पोलिस यंत्रणेची भीती दाखवली जात असेल, तर सध्या इंग्रजांपेक्षाही गंभीर हुकूमशाही आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.सातारा काँग्रेस कमिटीत रविवारी ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. योळी प्रांतिकचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘लोकसभेच्या निकालानंतर चार महिन्यांतच झालेल्या विधानसभांचा निकाल अनपेक्षित आहे. उमेदवारांनी निकालाबाबत अविश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत जे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत, त्यावर उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ते उपाययोजना करणार नसतील, तर लोकशाही संपल्याचे अधिकृत जाहीर करावे. यापुढील निवडणुका मतदान यंत्राऐवजी पेपर बॅलेटवर घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात, यासाठी देशव्यापी आंदोलन होणार आहे.’‘मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याबाबत ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासनाने दडपशाही करून खटले भरण्याची धमकी दिली. अनेक लोकांवर खटले भरले. हे ब्रिटिश काळातील दडपशाहीपेक्षा वाईट आहे. ग्रामसभा घेणे नागरिकांचा हा मूलभूत अधिकार आहे. दरम्यान, पदावर नसलो, तरी लोकांमध्ये असणार आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरणार असून, रचनात्मक विरोधी पक्ष काम करणार आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून यंत्रांची तपासणी करावीमोदींनी निवडणूक आयुक्त करण्याचा कायदा बदलला असल्याने हे सरकारी खाते झाले आहे. जसे पोलिस व प्रशासन वागले, त्याचप्रमाणे निवडणूक आयोग सरकारी खात्याप्रमाणे वागला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ पंचाकडून यंत्रांची तपासणी झाली पाहिजे. भारत जगातील मोठी लाेकशाही असून, जगभरातील नागरिकांची भारतातील लोकशाही टिकावी, अशी इच्छा आहे. यंत्रांची तपासणी शक्य नसेल, तर विधानसभेच्या निवडणुकीतील शंभर टक्के व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजाव्यात. चिठ्ठ्यांची मते जुळली, तर काही शंका राहणार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

चंद्रचूड यांनी सुवर्णसंधी गमावलीन्या. चंद्रचूड यांनी लोकशाही बळकट करण्याची संधी गमावली. देशाच्या इतिहासातला लोकशाहीसाठी सर्वात मोठा खटला हा पक्षांतर बंदी कायदा होता. त्यावेळी निर्णय दिला नाही. त्यामुळे बेकायदेशीर सरकार अडीच वर्षे चालू दिल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

शपथ घेतली नाही, तर आमदारकी रद्द नाहीमहाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतलेली नाही. याबाबत चव्हाण म्हणाले, शपथ घेतली नाही, तरीही आमदारकी रद्द होत नाही. या आमदारांना सभागृहातही जाता येते. मात्र, सभागृहात बोलता येत नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणEVM Machineईव्हीएम मशीनSupreme Courtसर्वोच्च न्यायालय