शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

तक्रारदारांचा आवाज दडपणे ही इंग्रजांपेक्षाही मोठी हुकूमशाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:47 IST

बॅलेट पेपरवरील निवडणुकांसाठी देशव्यापी आंदोलन

सातारा : ‘पारदर्शक निवडणुका प्रक्रिया राबवणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु, या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिला नाही. ईव्हीएमविरोधात तक्रार करणाऱ्या, बॅलेट पेपरसाठी ग्रामसभा घेणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्यांना न्यायालयाची अथवा पोलिस यंत्रणेची भीती दाखवली जात असेल, तर सध्या इंग्रजांपेक्षाही गंभीर हुकूमशाही आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.सातारा काँग्रेस कमिटीत रविवारी ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. योळी प्रांतिकचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘लोकसभेच्या निकालानंतर चार महिन्यांतच झालेल्या विधानसभांचा निकाल अनपेक्षित आहे. उमेदवारांनी निकालाबाबत अविश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत जे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत, त्यावर उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ते उपाययोजना करणार नसतील, तर लोकशाही संपल्याचे अधिकृत जाहीर करावे. यापुढील निवडणुका मतदान यंत्राऐवजी पेपर बॅलेटवर घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात, यासाठी देशव्यापी आंदोलन होणार आहे.’‘मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याबाबत ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासनाने दडपशाही करून खटले भरण्याची धमकी दिली. अनेक लोकांवर खटले भरले. हे ब्रिटिश काळातील दडपशाहीपेक्षा वाईट आहे. ग्रामसभा घेणे नागरिकांचा हा मूलभूत अधिकार आहे. दरम्यान, पदावर नसलो, तरी लोकांमध्ये असणार आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरणार असून, रचनात्मक विरोधी पक्ष काम करणार आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून यंत्रांची तपासणी करावीमोदींनी निवडणूक आयुक्त करण्याचा कायदा बदलला असल्याने हे सरकारी खाते झाले आहे. जसे पोलिस व प्रशासन वागले, त्याचप्रमाणे निवडणूक आयोग सरकारी खात्याप्रमाणे वागला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ पंचाकडून यंत्रांची तपासणी झाली पाहिजे. भारत जगातील मोठी लाेकशाही असून, जगभरातील नागरिकांची भारतातील लोकशाही टिकावी, अशी इच्छा आहे. यंत्रांची तपासणी शक्य नसेल, तर विधानसभेच्या निवडणुकीतील शंभर टक्के व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजाव्यात. चिठ्ठ्यांची मते जुळली, तर काही शंका राहणार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

चंद्रचूड यांनी सुवर्णसंधी गमावलीन्या. चंद्रचूड यांनी लोकशाही बळकट करण्याची संधी गमावली. देशाच्या इतिहासातला लोकशाहीसाठी सर्वात मोठा खटला हा पक्षांतर बंदी कायदा होता. त्यावेळी निर्णय दिला नाही. त्यामुळे बेकायदेशीर सरकार अडीच वर्षे चालू दिल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

शपथ घेतली नाही, तर आमदारकी रद्द नाहीमहाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतलेली नाही. याबाबत चव्हाण म्हणाले, शपथ घेतली नाही, तरीही आमदारकी रद्द होत नाही. या आमदारांना सभागृहातही जाता येते. मात्र, सभागृहात बोलता येत नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणEVM Machineईव्हीएम मशीनSupreme Courtसर्वोच्च न्यायालय