शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

‘काठावरची परंपरा’ शंभूराजनी मोडून काढली!

By admin | Updated: October 20, 2014 00:38 IST

थंड डोक्याने वापरलेला गनिमी कावा यशस्वी ठरल्यामुळे पाटण तालुक्यात उठाव झाला.

पाटण : पाटणच्या लढतीबाबतचे राजकीय विश्लेषकांचे अंदाज धुळीस मिळवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह यांचा तब्बल १८,८२४ मतांनी पराभर करत नवा इतिहास रचला. सततच्या पराभवाची चिड आणि पेटून उठलेला देसाई गटाचा कार्यकर्ता व शंभूराज यांनी थंड डोक्याने वापरलेला गनिमी कावा यशस्वी ठरल्यामुळे पाटण तालुक्यात उठाव झाला. त्यातच पाटणकरांनी उमेदवारांनी बदलल्याने गटातील काही नाराजांनी आपला उद्रेक विरोधातून दाखवत पाटणकरांना हादरा दिला. त्यामुळे विक्रमसिंह पाटणकर हे कोयना, पाटण या बालेकिल्ल्यासह सर्वच पातळीवर अपयशी ठरले.पाटण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी रविवार, दि. १९ रोजी सकाळी आठ वाजता सुरू झाली. शंभूराज देसाई हे प्रथमच गळ्यात भगवी पट्टी टाकून व डोक्यात गांधी टोपी घालून मतमोजणी केंद्रावर आले. तर सत्यजितसिंह पाटणकर त्यानंतर केंद्रावर पोहोचले. प्रथम कोयना विभागातील हेळवाक गटातील चौदा मतदान केंद्राचा मतमोजणीचा निकाल प्रथम लागला. त्यामध्ये १६९ मतांची आघाडी देसार्इंना देऊन गेली. कोयना, पाटण हे पाटणकरांचे बालेकिल्ले. तिथेच शंभूराज यांनी आघाडी घेतली. त्यामुळे देसार्इंचा कल दिसून आला. त्यानंतरच्या मतमोजणीच्या बारा फेऱ्यांमध्ये सत्यजितसिंह पाटणकर आघाडीवर होते.बाराव्या फेरीनंतर, सोळाव्या फेरीनंतर शंभूराज देसाई यांनी १,७६५ मतांची आघाडी घेत २९ व्या फेरीपर्यंत मुसंडी मारली. अखेर १८,८२४ मतांची विक्रमी आघाडी घेत शंभूराज देसाई निवडून आले. कोयना, पाटण, तारळे, मरळी, मल्हारपेठ, सुपने कुंभारगाव, तांबवे, चाफळ, मारुल हवेली अशा सर्वच जिल्हा परिषद गटांतून शंभूराज देसाई यांनी अलगद मुसंडी मारली.शंभूराज देसाई यांचे वाढते मताधिक्य पाहता, ते १३,५०० च्या मतांची आघाडी घेऊन पुढे होते. त्यानंतर फक्त चार फेऱ्यांची मतमोजणी करायची बाकी होती. तेव्हा दुपारी साडेतीनच्या सुमारास सत्यजितसिंह पाटणकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले. २००४ मध्ये ५,४०० मतांनी विजयी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा शंभूराज देसाई यांना २००९ मध्ये ५८० मतांनी पराभवाला समोर जावे लागले होते. त्याआगोदर विक्रमसिंह पाटणकर यांच्यासमोरचे दोन निसटते पराभव शभूराज यांना जिव्हारी लागले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी १९८० मध्ये विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज यांचे आई-वडील शिवाजीराव व विजयादेवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. जवळपास २२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे पराभवाचे चटके सोसलेल्या देसाई घराण्याच्या परतफेड करण्यासाठी शंभूराज यांनी पाटणकर विरोधात कंबर कसली होती.२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी गत दोन वर्षांपासून केलेले नेटके नियोजन व घेतलेले परिश्रम आणि शिवसेनेचा खांद्यावर भगवा घेऊन तयारी केली. त्यातच तिकडे विक्रमसिंह पाटणकर यांनी सत्यजितसिंह यांचे लॉचिंग करण्याचे ठरविल्याने आणि त्यांनी तसे धाडस केल्यामुळे ते अंगलट आले आणि निवडणुकीत पाटणकर प्रत्येक टप्प्यात अयशस्वी ठरले.पाटण जिल्हा परिषद गटातील गतवेळेचे १२ हजारांचे मताधिक्य देखील याखेपेस पाटणकर हरवून बसले. आणि दुसरीकडे शंभूराज यांनी संपूर्ण तालुक्याला डोक्यावर घेतले. त्यातच सुपने, कुंभारगाव, तांबवे हे कऱ्हाडमधील विभागदेखील देसार्इंच्या बाजूने राहिले. त्यामुळे १८,८२४ मतांनी शंभूराज यांचा विजयी झाला.निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जाधव यांनी शंभूराज देसाई विजयी झाल्याचे घोषित करताच मतमोजणी केंद्राच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर शंभूराज यांनी पाटण शहरात जाऊन लायबरी चौकातील गणेशाचे दर्शन घेतले. त्यावेळी याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला. (प्रतिनिधी)पाटण ते मरळी कारखाना भव्य मिरवणूककऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरील पाटणपासून शंभूराज देसाई यांची मिरवणूक सुरू झाली. म्हावशी येरफळे, अडूळ, नवारस्ता, मरळी, चोपदारवाडी येथील जनतेने त्यांचे भव्य स्वागत केले. महिलांनी हातामध्ये आरत्या घेऊन शंभूराज यांना ओवाळले.मरळी कारखाना परिसरात गुढ्या उभारल्याशंभूराज देसाई यांचे स्वागत करण्यासाठी मरळी गावात घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या. पाटण शहरात सामसूम, दुकान बंदसत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झाल्यामुळे पाटण शहरातील दुकाने बंद झाली, रस्त्यावर टायर पेटविण्यात आले. म्हावशी येथे पाटणकर समर्थकांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.पाटणकरांना चिंतन करायला लावणारा निकालपाटण तालुक्यात पक्षापेक्षा देसाई व पाटणकर गट म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज यांच्याबाजूने लागलेला १८,८२४ या मताधिक्याचा निकाल पाटणकर गटाचे अस्तित्व दाखवून देणारा ठरला आहे. त्यामुळे यापुढील काही महिने, वर्षे पाटणकर गटाला चिंतन करायला लागणार आहे. पाटणची लढत म्हणजे अत्यंत चुरशीची व काठावरची असते. मात्र, याखेपेस अगदी सर्व गणित व समीकरणे मोडीत काढून शंभूराज यांनी लक्षणीय मताधिक्य घेतले.उमेदवारपक्षमिळालेली मते२सत्यजितसिंह पाटणकरराष्ट्रवादी८५,५९५३हिंदुराव पाटीलकाँगे्रस७,६४२4दीपक महाडिकभाजप२,१०२5रवींद्र शेलारमनसे६४३6शिवाजी कांबळेबसप४५५7हनुमंत पाटीललो.आं.पा.१५१डॉ. संदीप माने (शेतकरी कामगार पक्ष -१२५), प्रियांका साळुंखे (बहुजन मुक्ती पार्टी -८९)अपक्ष : सागर माने (२,०८४), दत्तात्रय भिसे (१,२८७), गणेश मोरे (८८८), चंद्रकांत यादव (२३७), सुनील कांबळे (२१२), बंडू गळवे (११०)(शंभूराज देसाई १८,८२४ मताधिक्याने विजयी) जनतेच्या दारात सत्ता आणण्यात यशस्वीपाटणच्या वाड्यात अडकलेली सत्ता जनतेच्या दारात आणण्यात यशस्वी झालो आहे. पाटणच्या जनतेने व माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी कधीच विसरणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यकाळ पुन्हा पाटण तालुक्यात अवतरेल, असेच काम करुन दाखवेन. धनशक्तचा अस्त आणि जनशक्तीचा सुर्योदय झाला आहे.- शंभूराज देसाई, शिवसेनापाटणच्या जनतेसाठी सदैव कार्यरतपराभवाने खचून जावू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सर्वांनी शांतता राखावी. जनतेने दिलेला कौल मी मान्य करतो. यापुढेही पाटणच्या जनतेसाठी सदैव कार्यरत राहीन. झालेल्या पराभवाची कारणे शोधून पुढील दिशा ठरवली जाईल.- सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादी