शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Satara: मुख्यमंत्र्यांकडून मागण्या मान्य, लेखी आदेशाची प्रतीक्षा - डॉ. भारत पाटणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 05:25 IST

Eknath Shinde: मुंबईला मंत्रालयात अपेक्षित असलेली प्रकल्पग्रस्तांची निर्णायक बैठक दि. २२ जूनला दरे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी लढ्याच्या जवळजवळ सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या.

कोयनानगर - मुंबईला मंत्रालयात अपेक्षित असलेली प्रकल्पग्रस्तांची निर्णायक बैठक दि. २२ जूनला दरे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी लढ्याच्या जवळजवळ सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून, मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होऊन येत्या आठवड्यात अंतिम निर्णय हाेणार असल्याची माहिती डाॅ. भारत पाटणकर यांनी पाटण येथील पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पाटणकर म्हणाले, बैठकीस मदत पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पाटबंधारे विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, जलजीवन मिशनचे सचिव अमित सैनी, कृष्णा खोरेचे मुख्य अभियंता धुमाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी गलांडे, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, संतोष गोटल, प्रकाश साळुंखे, नामदेव उत्तेकर उपस्थित होते.

डाॅ. पाटणकर म्हणाले, बैठक झाली असली तरी सर्व लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत उपोषणाचा निर्णय परत घेणार नाही. या संदर्भात दि. २७ रोजी कोयनानगर येथे सांगली, सातारा, कोल्हापूर येथील प्रकल्पग्रस्तांची बैठक आयोजित केली आहे.

डाॅ. पाटणकर म्हहणाले, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. त्यानुसार कोयना धरणग्रस्तांपैकी ज्यांना अजिबात जमीन दिलेली नाही, त्यांचे अर्ज प्रथम क्रमांकाने स्वीकारले जातील. यासाठी फक्त वारस दाखला व जमीन न मिळाल्याचे प्रतिज्ञापत्र एवढेच जोडणे पुरेसे आहे. अन्य कागदपत्रे सरकारकडेच असल्यामुळे त्यांची मागणी केली जाणार नाही. जमीन ताब्यात घेऊन राहायला जाण्यासाठी नियोजन आराखडा तयार करून गावठाणे विकसित केली जातील. कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. कोयना वगैरे अभयारण्यग्रस्तांना याच पद्धतीने जमीन वाटप केली जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर आजपर्यंत प्राप्त सुमारे आठशे प्रकल्पग्रस्तांच्या अर्जांची तपासणी करून जमीन वाटप सुरू होईल.

कब्जेहक्काच्या रकमेच्या वसुलीच्या शासन निर्णयाबाबत सकारात्मक निर्णय झाला. जमिनीच्या मूळ किमतीवर कसलेही व्याज लावू नये आणि लाभक्षेत्रातील दिलेल्या जमिनीला पाणी दिल्यानंतर एक वर्षाने हप्त्याने वसुली करावी, असे ठरविण्यात आले. या निर्णयांचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे कोयनेसह सात लाख प्रकल्पग्रस्तांना होणार आहे.

गोकुळ, रासाटी, हेळवाक (शिवंदेश्वर), मणदूर या चार गावांच्या पुनर्वसनाचे खास बाब प्रस्ताव करण्याचे ठरले. याचबरोबर कोयनेची सर्व गावठाणे अधिकृत करून नागरी सुविधांसाठी आवश्यक असणारा निधी देऊन शंभर टक्के नागरी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेस संतोष गोटल, सचिन कदम, महेश शेलार, विनायक शेलार, श्रीपती माने, राम कदम, पी. डी. लाड, सीताराम पवार, किसन सुतार, परशुराम शिर्के, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार