शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारणसाठीच्या सरपंचपदावरही राखीवचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

सातारा : रस्सी जळाली तरी पीळ जळत नाही असे म्हणतात. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या असाच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक ...

सातारा : रस्सी जळाली तरी पीळ जळत नाही असे म्हणतात. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या असाच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर सर्वसामान्य गटातील उमेदवारासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य गटातील लोकांना सरपंच होता येईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सत्ता उपभोगायची सवय लागलेल्या आणि गावाची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी यासाठी आता मागास आणि इतर राखीव गटातील लोकही सर्वसाधारणच्या जागेवर हक्क सांगू लागलेत. त्यामुळे यावेळी सर्वसाधारण गटातील उमेदवार सत्तेबाहेरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली आहे.

गेल्या पंधरा वर्षांत ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य गटातील उमेदवाराला संधी मिळाली नाही त्यांना यावेळी संधी मिळाली आहे. मात्र, पंधरा वर्षांत एवढे बदल झाले आहेत की सत्तेची चावी आपल्याच हातात राहावी अशी अपेक्षा मागास, इतर मागास आणि राखीव महिला गटातील उमेदवारांची आहे. त्यामुळे दोन दिवसांत होणाऱ्या सरपंच निवडीवर इतर गटातील उमेदवारांचाच अधिक डोळा आहे. यासाठी सर्वसामान्य गटातील व्यक्तीला केवळ सत्तेचा सारिपाट पाहत बसावे लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांत मागास गटांना प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, ही बाबदेखील तेवढीच खरी आहे. त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक आरक्षणानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व मिळावे आणि सर्वांचाच गावाच्या विकासात सहभाग असावा यासाठी हे नियोजन करण्यात आले होते. महिला राखीव, ओबीसी राखीव, अनुसूचित जाती, जमाती राखीव अशी सर्व आरक्षणे झाल्यानंतर आता सर्वसाधारण गटासाठी आरक्षण पडले. मात्र, हे आरक्षण राखीव नाहीच. या गटात कोणीही अर्ज दाखल करू शकते. त्यामुळे विविध राखीव गटांतील उमेदवार सरपंचपदासाठी इच्छुक आहेत. या आरक्षण पद्धतीमुळे भविष्यात कधीही सर्वसामान्य गटातील व्यक्तीला गावचे सरपंच होता येणार नाही, अशीच भीती व्यक्त केली जात आहे.

सर्वसाधारण गट म्हणजे सर्वांसाठी खुला गट असा त्याचा अर्थ होतो. पण, या पदावर निवड करताना सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या उमेदवारांचाच विचार होणे अपेक्षित आहे. सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या व्यक्ती बाजूला राहतात आणि राखीव गटातून निवडून आलेल्या व्यक्ती या सर्वसाधारण गटावर मात करतात. हा प्रकार सर्वांसाठीच अडचणीचा ठरत आहे.

चौकट

पंधरा वर्षे थांबा अन् पंधरा वर्षांनंतरही थांबा

पंधरा वर्षे आरक्षण नाही म्हणून सर्वसाधारण गटातील लोकांनी थांबायचे आणि आरक्षण पडल्यानंतरदेखील इतर गटातील लोकांनी हक्क सांगितल्यानंतर पुन्हा थांबायचे असा प्रकार होऊ लागल्याने खुल्या गटातील लोक हतबल झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागण्यात आली आहे.

कोट

जिल्ह्यातील १२१ जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी आणि ६० जागा पुरुषांसाठी असे आरक्षण सोडतीवेळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सरपंचपदाचे वाटप व्हावे. मात्र, सध्या सर्वसाधारण गटातील जागांवरही इतर राखीव गटातील उमेदवार हक्क सांगू लागल्याने याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

- धनंजय शिंदे,

सजग नागरिक सामाजिक संस्था