शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात पाऊस वाढू लागला; महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर कोयना धरणात ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार आठवड्यांपूर्वी धो-धो पाऊस कोसळत होता. अवघ्या तीन दिवसांत पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोलीसह इतर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते तुटले होते, पूल वाहून गेलेले. त्यामुळे अनेक गावेही संपर्कहीन झालेली. तर या अतिवृष्टीत शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच पश्चिम भागातील पावसामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर विक्रमी पाणीसाठा झाला होता. कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यांसारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. असे असतानाच तीन आठवड्यांपासून पश्चिम भागात तुरळक पाऊस होत होता. यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली होती. परिणामी कोयनावगळता इतर धरणांतील विसर्ग बंद करण्यात आलेला. पण, दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ११ मिलिमीटर पाऊस झाला. नवजा येथे २६ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जूनपासून कोयनेला ३५१८, नवजा ४५४८ आणि महाबळेश्वर येथे ४७३० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २१०० क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. धरणात ९२.५९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

चौकट :

प्रमुख धरणांत ८० टक्क्यांवर पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम आणि बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता १४६ टीएमसीवर आहे. सध्या पाऊस कमी असला तरी सर्वच धरणांत ८० टक्क्यांच्या वर पाणीसाठा झालेला आहे. कोयना धरणात तर जवळपास ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८६ टक्के, उरमोडीत ८३ टक्क्यांवर आणि तारळी धरणात जवळपास ९० टक्के पाणीसाठा झालेला आहे.

..............................................................