शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

सातारा जिल्'ातील पेरणीवर पावसाचा परिणाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 6:40 PM

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू होते.

सातारा : यावर्षी सततचा आणि नोव्हेंबर महिन्यामध्येही झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्'ातील रब्बी पेरणी पुढे गेली. त्यामुळे आतापर्यंत फक्त ७० टक्केच पेरणी झालीय. तर गतवर्षी ८० टक्केहून अधिक पेरणी झालेली. यावर्षी ज्वारीच्या क्षेत्रात घट होत असून, आतापर्यंत फक्त ७५ टक्केच पेरणी झाली आहे. तर यापुढे गहू, हरभऱ्यालाच शेतकरी पसंती देऊ शकतात.

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू होते. यंदा मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे संपूर्ण चित्रच पालटलंय. कारण, यावर्षी जुलै महिन्यापासून पश्चिम भागात सतत पाऊस सुरू झाला. तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत होत होता. तसेच पूर्व भागात तर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला जोरदार सुरुवात झाली.

हा परतीचा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. या पावसाने गेल्या दहा वर्षांतील उच्चांक गाठला. त्यातच दिवाळीनंतरही नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. त्यामुळे जमिनीत पाणी साठले. परिणामी आगाऊ पेरणी केलेलीही वाया गेली. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.

जिल्'ातील शेतकऱ्यांनी ख-या अर्थाने रब्बी हंगामाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सुरू केली. त्यामुळे पेरणीला उशीर होऊ लागलाय. काही ठिकाणी ज्वारीची दुबार पेरणी झालीय. सध्या जिल्'ात रब्बी हंगामाची पेरणी जवळपास ७० टक्के झालीय. रब्बीचे क्षेत्र २ लाख १४ हजार ८२३ हेक्टर असलेतरी आतापर्यंत १ लाख ५० हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्यामध्ये ज्वारीची पेरणी ७५ टक्के, गहू ५५, मका ६८, हरभरा ६२ टक्के अशी प्रमुख पिकांची पेरणीची टक्केवारी राहिलीय.

जिल्'ात सर्वात जास्त रब्बीचे क्षेत्र माण तालुक्यात २८ हजार ८५५ हेक्टर असून, आतापर्यंत येथे २५ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झालीय. यापुढे ज्वारीची पेरणी होण्याची शक्यता कमी आहे. खटावला २२ हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी पेरणी फक्त ८ हजार ६०० हेक्टरवरच झालीय. फलटणला २१ हजारपैकी १६ हजार हेक्टर ज्वारीची पेरणी झाल्याचे दिसून आले आहे.

जिल्'ाचा विचार करता सातारा तालुक्यात आतापर्यंत ५५ टक्के पेरणी झालीय. तसेच जावळीत ६४ टक्के, पाटण ७६, क-हाड ५७, कोरेगाव ७७, खटाव ४७, माण तालुका ९०, फलटण ६९, खंडाळा ७४, वाई ८३ टक्के पेरणी झाली आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात रब्बीचे क्षेत्र ६४८ हेक्टर असून, पेरणी १०० टक्के झाली आहे. रब्बीची पेरणी अजूनही सुरू असून, यापुढे गहू, हरभरा, मका पिकालाच शेतकरी पसंती देतील, असेच चित्र आहे. तसेच इतर पिकांचाही त्यांच्यापुढे पर्याय आहे.सर्वच पिकांची यंदा पेरणी टक्केवारी कमी...गतवर्षी १९ डिसेंबरपर्यंत जिल्'ात रब्बीची पेरणी जवळपास ८० टक्के झालेली. यामध्ये ज्वारीची ८२ टक्के, गहू ६२, हरभरा ७७ टक्के क्षेत्रावर होता. रब्बीतील या तिन्ही प्रमुख पिकांची चांगली पेरणी झालेली. यावर्षी मात्र या तिन्ही पीक पेरणीत घट झाली आहे. तसेच गतवर्षीपेक्षा यंदा सर्वच पीक पेरणी कमी झाल्याचेच दिसून येत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीRainपाऊस