शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरपंचांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

सातारा : ग्रामपंचायत सरपंच सोडतीवर आक्षेप घेतला गेल्याने उच्च न्यायालयाने सरपंच निवडीचा कार्यक्रम थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

सातारा : ग्रामपंचायत सरपंच सोडतीवर आक्षेप घेतला गेल्याने उच्च न्यायालयाने सरपंच निवडीचा कार्यक्रम थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची सरपंच निवड या आदेशामुळे लटकली आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी नुकतीच आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतीवर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये सदस्यांनी अक्षेप घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे आरक्षणाबाबत मागणी केली होती. याचिकांवर आज सुनावणी होऊन न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आपला निकाल जाहीर केला.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी सरपंच आरक्षण सोडतीवर आक्षेप आहे, त्याठिकाणी सदस्यांच्या तक्रारीबाबत पुन्हा सुनावणी घेण्यात यावी. त्यानंतरच आरक्षण निश्चित करावे. तोपर्यंत सरपंचपदाच्या निवडणुका घेऊ नका, असे म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यातील नुकत्याच निवडणुका झालेल्या ८७८ तसेच आगामी काळात निवडणुका होणाऱ्या उर्वरित अशा एकूण १४९५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीसाठीचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता. या आरक्षण सोडतीमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकही सदस्य जाहीर केलेल्या आरक्षणात नसल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांवर अन्याय होणार असल्याने याचिका दाखल झाल्या होत्या. जिल्हा प्रशासन संपूर्ण सरपंच सोडत नव्यानेच घेते की तक्रारी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये फेरसुनावणी घेऊन सरपंच आरक्षण सोडत जाहीर करते याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ८, ९ आणि १० फेब्रुवारी रोजी जाहीर केलेला कार्यक्रम होणार का याबाबतदेखील उलटसुलट चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला याबाबतचा आदेश मिळाला नाही, आदेश मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे यांनी दिली.