शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीज, वाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:13 AM

सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.

ठळक मुद्देपावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीजवाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक, धान्य अन् जीवनावश्यक वस्तूंचा साठा

लक्ष्मण गोरे बामणोली : सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून ते सप्टेंबर ही चार महिने अति पावसाचे असतात. मान्सून सुरू झाला की दळणवळण व संपर्काची यंत्रणा ठप्प होतात. जावळी तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत.

या गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावातील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. अशा ठिकाणचे ग्रामस्थ साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रक्कमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. पावसाळ्यात चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो.

पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. या गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही. शिवाय ऊबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. घरांची डागडुजी उन्हाळ्यातच सुरू असते.जनावरांची वैरण अन् सरपण पोटमाळ्यावरतापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. अशा वेळी पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात.

लॉकडाऊनमुळे यंदा चाकरमानी गावालाच आहेत. नदीपलीकडील गावांना लाँच बंद तसेच लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने अनेक ग्रामस्थांना पावसाळ्यातील अन्नधान्यसाठा करता आला नाही.- शिवराम चव्हाण,लामज, ता. महाबळेश्वर

पावसाळ्याचा धान्यसाठा तळदेव ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी कसरत करावी लागते.- पांडुरंग पवार, तळदेव, मायणी, ता. जावळी.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर