शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या मालामुळे बटाट्याचे दर गडगडले...

By admin | Updated: April 10, 2015 23:51 IST

व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता : पालेभाज्यांच्या दरावर होणार परिणाम

सातारा : बाजारात महाराष्ट्रीयन बटाट्याबरोबर गुजराती बटाट्याची ही मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्याने बटाट्याचे दर गडगडले असून, याचा पालेभाज्यांच्या दरावरही परिणाम झाला आहे. यामुळे भाजी मंडई आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील वातावरण हे बटाटा पिकाला अनुकूल असल्याने यावेळी महाराष्ट्रात विक्रमी बटाटा उत्पादन झाला आहे. तर गुजरातहूनही अधिक प्रमाणात बटाटा महाराष्ट्रात विक्रीला आला असल्याने मागणी पेक्षा उत्पादन जास्त असल्याने बटाट्याचे दर उतरले आहे. आठवडा बाजारादिवशी महाराष्ट्रीयन बटाटा दहा किलोला ७० ते १०० रुपये, तर गुजराती बटाट्याला ४० ते ७० रुपये दर मिळाला आहे. हे दर अजून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत टिकून राहतील, अशी शक्यता शेतकरी वर्गाने वर्तवली आहे. यावर्षी खराब वातावरणामुळे राज्यात बटाटा पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे मागील वर्षी १९ ते २० रुपये किलो विक्रीला जाणारा बटाटा आज केवळ सात ते दहा रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. तर याची दुसरी बाजू म्हणजे गुजरातहून आलेला बटाटा हा जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यामुळे हा बटाटा वेळेत विकला जावा म्हणून गुजरात बटाटा स्वस्त मिळत असल्याने याचा फटका महाराष्ट्राच्या बटाट्यावरही झाला आहे. बटाट्याचे दर उतारले आहेत. गेल्या तीन वर्षांत बटाट्याला पहिल्यांदाच एवढा कमी दर मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, साताऱ्यात बहुदा तळेगाव व खटाव तालुक्यातून लोकल बटाट्याचे उत्पादन घेतले जाते; परंतु सध्या खटाव तालुक्यात बटाट्याचे पीक घेणे कमी झाले असून, येथील शेतकरी वर्ग हा उसाच्या पिकाकडे वळाला आहे. त्यामुळे साताऱ्यात लोकल बटाटा हा कमी झाला आहे. (प्रतिनिधी) शीतगृहाचा बटाटा देशभर बटाट्याला मोठी मागणी संपूर्ण देशात आहे. यामुळे हंगामी बटाटा वर्षभर टिकून राहण्यासाठी शीतगृहाचा वापर केला जातो. प्रमुख्याने इंदोर आणि आग्राचा बटाटा हा संपूर्ण देशात वर्षभर आयात केला जातो. या दोन्ही राज्यांत बटाटे शीतगृह ठेवून आयात करतात. मध्यंतरी साताऱ्यात बटाटा हा ३० ते ४० रुपये दर होता, तो बाहेरून म्हणजेच परराज्यातून विक्रीसाठी आला होता. बटाट्याच्या दरावरच पालेभाज्यांचा दर अवलंबून असतात. बटाट्याचे दर उतरले तर भाज्यांचे दरही उतरतात अन् बटाटा तेजीत आला तर पालेभाज्यांचे दरही तेजीत येतात. त्यामुळे संपूर्ण भाजी मंडई दर हे बटाट्यांच्या आवकावर व दरावर अवलंबून असतो. यंदा बटाटा उत्पादन जास्त झाला असल्याने इतर भाजी मंडईचे दरही आता आवाक्यात आहेत.