शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

एका कारखान्याकडून दहा दिवसांत पेमेंट तर दुसऱ्याकडून वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील साखर हंगाम गतिमान होत असतानाच ऊस दराबाबत अनेक कारखान्यांनी तोंडावर बोट ठेवत बगल दिली आहे. ...

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील साखर हंगाम गतिमान होत असतानाच ऊस दराबाबत अनेक कारखान्यांनी तोंडावर बोट ठेवत बगल दिली आहे. अजिंक्यतारा साखर कारखान्याने या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला दहा दिवसांत पहिली उचल दिली आहे. याउलट किसन वीर कारखान्याने वर्षानंतरही काही लोकांचे उसाचे पैसे दिले नसल्याचा आरोप होत आहे.

एफआरपीनुसार ऊसदर ही ऊस दराबाबतची भूमिका निश्चित झाल्यानंतर राज्यातील साखर हंगामाचा प्रारंभ झाला. खरंतर या वेळेसच प्रत्येक कारखान्याने आपआपली एफआरपी रक्कम किती आहे हे जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, हे धाडस काही कारखाने वगळता कुणीही केले नाही. एफआरपी कायद्याअंतर्गत ऊसतोडणी झालेल्या दिवसापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी एफआरपी जमा करणे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र, एफआरपीच्या या नियमाची गेल्या अनेक वर्षांपासून चेष्टा करण्याचे काम साखर कारखानदार करीत आहेत.

जिल्ह्यात गत पाच वर्षांत सहकाराच्या बरोबरीत खासगी कारखानदारी उभी राहिली असली तरी अजिंक्यतारा सह्याद्री कृष्णासारखे सहकारी साखर कारखाने सहकारात कशा पध्दतीने आदर्श काम करत आहेत, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई म्हणाले, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अत्यंत नियोजन आणि नेटक्या पध्दतीने कार्यरत आहे. सर्वात पहिल्यांदा साखर कारखान्यानी आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे. साखरेचा दर्जा आणी साखर विक्रीबाबतचे योग्य धोरण याबाबत काळजी घेणे अपेक्षित आहे. हे काम अजिंक्यतारा साखर कारखाना योग्य पद्धतीने करीत आहे. यामुळेच दहाव्या दिवसाला शेतकऱ्यांना ऊस पेमेंट करणे शक्य होत आहे. साखळी पध्दतीने साखर हंगामाची दरवर्षी दिशा बदलत असल्याने या हंगामात क्षेत्र मुबलक असल्याने ऊस उत्पादक ऊस घालविण्याच्या चिंतेत आहे. त्यामुळे ऊसदराची चिंता न करता मिळेल त्या कारखान्याला ऊस घालण्याचे काम हा शेतकरी करीत आहे. याचा फायदा ऊसतोडणी यंत्रणा, कारखानदार घेत आहेत. शरयूसारखा कारखाना कोणतेही हमीपत्र न करता एफआरपीपेक्षा पाचशे रुपये शेतकऱ्यांना कमी दर देत आहे. या कारखान्याबाबत साखर आयुक्तांनी योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.’