शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

केवळ एका थोबाडीनं दोन गावं वेठीस !

By admin | Updated: March 15, 2015 00:18 IST

जखिणवाडी, नांदलापूर सुन्न : लौकिकाला गालबोट, चार दिवसांपूर्वीच पडली होती वादाची ठिणगी

मलकापूर : जखिणवाडी जसं पुरस्कारप्राप्त आदर्श गावं तसंच नांदलापूरही उपक्रमशील आणि विकसनशील गावं. पण रंगपंचमीदिवशी एका युवकाने दुसऱ्या युवकाला दिलेली एक चापट या दोन्ही गावांना शनिवारी महागात पडली. जखिणवाडीच्या युवकांनी नांदलापूरमध्ये जाऊन दिसेल त्याला मारहाण केली. गज आणि काठ्या नाचवत त्यांनी दहशतही माजवली. रंगपंचमीच्या दिवसापासून जखिणवाडी आणि नांदलापूर ही दोन गावे चर्चेत आहेत. रंगपंचमीदिवशी जखिणवाडीत परंपरागत रंगोत्सव साजरा केला जातो. या दिवशी गावातील मुख्य रस्त्यावर बैलगाड्या धावतात. बैलगाड्यांमधील ग्रामस्थ रस्त्याकडेला थांबलेल्यांवर आणि रस्त्याकडेचे ग्रामस्थ बैलगाडीस्वारांवर रंग उधळतात. गत दीडशे वर्षांपासून गावाला ही परंपरा असल्याचे सांगितले जाते; पण यावर्षी बुधवारी झालेल्या रंगोत्सवात अघटित घडले. युवक आणि पोलिसांमध्ये मारामारी झाली. युवकाने पोलिसांवर गुलाल उधळल्यामुळे संबंधित युवकाला पोलिसांनी मारहाण केली. मात्र, नंतर त्याचे रूपांतर तणावात झाले. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून हुज्जत घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. वादावादीचे हे वादळ शांत होत असताना त्याचदिवशी सायंकाळी जखिणवाडी गावात रंग उडविण्यासाठी पाण्याची पाईप घेतल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. त्या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून काहीजणांना अटक केली. या प्रकारामुळे जखिणवाडी गावात गेल्या चार दिवसांपासून तणावपूर्ण शांतता आहे. बुधवारीच रंगपंचमीदिवशी नांदलापुरातही मारामारीची घटना घडली होती. त्यामध्ये दोघे जखमी झाले होते. ते प्रकरण अद्यापही धुमसत आहे. अशी परिस्थिती असताना बुधवारी नांदलापुरातील एका युवकाने जखिणवाडीतील एका युवकाच्या थोबाडीत लगावली. या घटनेचे चांगलेच पडसाद उमटले. जखिणवाडीतील तीस ते चाळीस युवकांनी नांदलापूर गावात घुसून दिसेल त्याला मारहाण केली. गज व काठ्या नाचवत चांगलीच दहशत माजवली. कोण आणि कशासाठी मारहाण करतायत, याची कसलीच कल्पना ग्रामस्थांना नव्हती. त्यामुळे गावात फक्त गडबड आणि गोंधळच निर्माण झाला. ज्यावेळी खरा प्रकार समोर आला त्यावेळी नांदलापुरातील ग्रामस्थही आक्रमक झाले होते. मात्र, तोपर्यंत पोलीस गावात पोहोचले. पोलिसांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनीही युवकांना शांत राहण्याची सूचना करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत या दोन्ही गावांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. (वार्ताहर)