शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

धोम धरणात केवळ चाळीस टक्केच पाणी

By admin | Published: October 04, 2015 9:20 PM

पाणीपातळी घटली : बळीराजाची चिंता वाढली; पावसाअभावी मे महिन्यासारखी परिस्थिती

पसरणी : वाई तालुक्यातील धोम-बलकवडी ही धरणे दरवर्षी आॅगस्टअखेर पूर्ण क्षमतेने भरलेली असतात; मात्र यंदा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या धोम व वाई तालुक्यातच पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने पावसाचा हंगाम कोरडा गेला. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्या पावसाने पाणी पातळीत थोडीशी भर पडली होती. मात्र, तेही पाणी आसरे बोगदा व कॅनॉलद्वारे सोडण्यात आले आणि त्यामुळे जेवढी पाण्याची पातळी वाढली होती, ती सुद्धा खालावली आहे.प्रमुख धोम धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा पाणीसाठा आहे. विशेषत: दोन्ही धरणांच्या दरवाजाला पाणीही लागले नाही. ज्या ठिकाणी पाण्याची पातळी आहे, ती दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यांमध्ये असते. मात्र यंदा आॅक्टोबरमध्येच मे महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला तसेच पिण्याचा पाणी व उपचार सिंचन योजनांना याचा फटका बसत आहे. विशेषत: हा सर्व भाग हा धरणग्रस्त आहे आणि आपल्या कहक्काचे पाणी आतामात्र आपल्याला प्राधान्याने मिळावे, अशी भावना नागरिकांतून होत आहे.धरणाची पाणीपातळी हा आॅक्टोबर महिन्यातच चिंतेचा विषय बनला आहे. अजून आगामी मान्सून येण्यासाठी आठ- नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे. सध्या सुरू असणारा पावसाने धरण पातळीत किंचितही वाढ झाली नाही. विशेषत: धरण परिसरात हा पाऊस समाधानकारक असा पडला नसून धरण पातळी ‘जैसे थे’ आहे.धरण व्यवस्थापणापुढे पाणी व्यवस्थापणा बाबत अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. (वार्ताहर)पावसाने यंदा दाखवलेली अवकृपा व त्यामुळे धरणाच्या पातळीत वाढच झाली नाही आणि मग जर ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असताना पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. -दत्तात्रय सुर्वे, शेतकरी धोम धरण हा १३.५० टीएमसीचा असून, धरण क्षेत्रात आजअखेर ४९५ मिमी पावसाची नोंद आहे. धरणाची पाणीपातळी ७३७ मीटर असून, सध्याचा पाणीसाठी १७६.५८ द.ल. घ.मी. म्हणजे ६.२३ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठी १२५.३१ द.ल. घ.मी. म्हणजे ४.४२ टीएमसी आहे. धरण आजअखेर ४० टक्के भरले आहे. एकूण १३.५० टीएमसीपैकी धरणातील ११.६९ टीएमसी हा एवढाच साठा उपयुक्त आहे. मात्र यंदा आजअखेर ४.४२ टीएमसी एवढाच साठा उपयुक्त म्हणून शिल्लक आहे.-सी. एस. सणस, शाखा अभियंता