शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ग्राहकांकडून १० महिन्यांत वीज बिलांचा एकदाही भरणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

सातारा : अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या ...

सातारा : अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर झाली आहे. वीजक्षेत्रातील संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल एक लाख ६३ हजार वीजग्राहकांनी एकाही महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. सध्या वीजपुरवठा सुरू असलेल्या या सर्व ग्राहकांकडे तब्बल ९१ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. सध्या जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तीन लाख १७ हजार ग्राहकांकडे तब्बल १४५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे.

कोरोना संकटातील ‘लॉकडाऊन’मध्ये मीटर रीडिंग घेता आले नाही. ‘अनलॉक’नंतर देण्यात आलेल्या सरासरी वीजबिलांची योग्य दुरुस्ती करण्यात आली. तसेच मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल देण्याची प्रक्रियाही पूर्ववत झाली. अनलॉकनंतर मीटर रीडिंगप्रमाणे देण्यात आलेली वीज बिले अचूक असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनीही दिलेला आहे. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील एक लाख ६३ हजार १३४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी माहे नोव्हेंबरपर्यंतच्या एकाही वीज बिलाचा भरणा केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये तब्बल ९१ कोटी ९२ लाख रुपयांची भर पडली आहे.

गेल्या १५ वर्षांमध्ये विविध गंभीर संकटांवर मात करीत महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. जागतिक तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा आता वीजग्राहकांना घरबसल्या मोबाईल अ‍ॅपसह ‘ऑनलाईन’द्वारे उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेतीन कोटी वीजग्राहक हे महावितरणचे आहेत. फोटो मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल देण्यास प्रारंभ करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी आहे. मात्र वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यांमध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील विभागनिहाय ग्राहकसंख्या (कंसात थकबाकी) पुढीलप्रमाणे :

सातारा विभागात ३२ हजार ८०६ ग्राहकांची १८.८० कोटी, कऱ्हाड विभागात ४४ हजार ६२८ ग्राहकांची २५.२६ कोटी, फलटण विभागात ३५ हजार ७१३ ग्राहकांची २० कोटी, वडूज विभागात २४ हजार ३०५ ग्राहकांची ११.८४ कोटी, तर वाई विभागात २५ हजार ६८४ ग्राहकांची १६.०२ कोटी थकबाकी दिसत आहे.