शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

उरमोडीच्या पाण्याची पळवापळवी; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 

By नितीन काळेल | Updated: October 9, 2023 19:09 IST

पाणीपट्टीची भरमसाठ वाढ रद्द करा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ पडला असताना सर्वस्तरातील पाणीपट्टीत भरमासाठ वाढ करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार तत्काळ रद्द करावा. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करुन उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी केली आहे. याची चाैकशी करुन संबंधितांना निलंबीत करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना संघटनेने निवेदन दिले आहे.यामध्ये म्हटले आहे की, संपूर्ण सातारा जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्हात दुष्काळ असताना आचानक सर्वस्तरावरील पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. हा प्रकार तत्काळ रद्द करण्यात यावा. तसेच याबाबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात चौकशी केली असता असा निर्णय कुठेही झालेला नाही. फक्त सातारा जिल्ह्यात लागू करुन शेतकऱ्यांना फसविणे व लुटण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी रक्कम भरणार नाहीत.सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी आधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कण्हेर भुयारीमार्गाने राजकीय दबावाखाली आणि अर्थपूर्ण तडजोडी करून केली आहे. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच त्यांच्या सपंत्तीची चाैकशी करावी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जूनभाऊ साळुंखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपतालुकाप्रमुख संजय जाधव यांच्यासह राजू घाडगे, उमेश घाडगे, जनार्दन आवारे, महादेव डोंगरे, संतोष घाडगे, शशिकांत घोरपडे, रावसाहेब घोरपडे, सुधाकर शितोळे, विश्वासराव घोरपडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना