शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

उरमोडीच्या पाण्याची पळवापळवी; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 

By नितीन काळेल | Updated: October 9, 2023 19:09 IST

पाणीपट्टीची भरमसाठ वाढ रद्द करा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ पडला असताना सर्वस्तरातील पाणीपट्टीत भरमासाठ वाढ करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार तत्काळ रद्द करावा. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करुन उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी केली आहे. याची चाैकशी करुन संबंधितांना निलंबीत करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना संघटनेने निवेदन दिले आहे.यामध्ये म्हटले आहे की, संपूर्ण सातारा जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्हात दुष्काळ असताना आचानक सर्वस्तरावरील पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. हा प्रकार तत्काळ रद्द करण्यात यावा. तसेच याबाबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात चौकशी केली असता असा निर्णय कुठेही झालेला नाही. फक्त सातारा जिल्ह्यात लागू करुन शेतकऱ्यांना फसविणे व लुटण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी रक्कम भरणार नाहीत.सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी आधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कण्हेर भुयारीमार्गाने राजकीय दबावाखाली आणि अर्थपूर्ण तडजोडी करून केली आहे. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच त्यांच्या सपंत्तीची चाैकशी करावी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जूनभाऊ साळुंखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपतालुकाप्रमुख संजय जाधव यांच्यासह राजू घाडगे, उमेश घाडगे, जनार्दन आवारे, महादेव डोंगरे, संतोष घाडगे, शशिकांत घोरपडे, रावसाहेब घोरपडे, सुधाकर शितोळे, विश्वासराव घोरपडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना