शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उरमोडीच्या पाण्याची पळवापळवी; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 

By नितीन काळेल | Updated: October 9, 2023 19:09 IST

पाणीपट्टीची भरमसाठ वाढ रद्द करा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ पडला असताना सर्वस्तरातील पाणीपट्टीत भरमासाठ वाढ करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार तत्काळ रद्द करावा. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करुन उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी केली आहे. याची चाैकशी करुन संबंधितांना निलंबीत करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना संघटनेने निवेदन दिले आहे.यामध्ये म्हटले आहे की, संपूर्ण सातारा जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्हात दुष्काळ असताना आचानक सर्वस्तरावरील पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. हा प्रकार तत्काळ रद्द करण्यात यावा. तसेच याबाबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात चौकशी केली असता असा निर्णय कुठेही झालेला नाही. फक्त सातारा जिल्ह्यात लागू करुन शेतकऱ्यांना फसविणे व लुटण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी रक्कम भरणार नाहीत.सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातील पाण्याची पळवापळवी आधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कण्हेर भुयारीमार्गाने राजकीय दबावाखाली आणि अर्थपूर्ण तडजोडी करून केली आहे. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच त्यांच्या सपंत्तीची चाैकशी करावी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जूनभाऊ साळुंखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपतालुकाप्रमुख संजय जाधव यांच्यासह राजू घाडगे, उमेश घाडगे, जनार्दन आवारे, महादेव डोंगरे, संतोष घाडगे, शशिकांत घोरपडे, रावसाहेब घोरपडे, सुधाकर शितोळे, विश्वासराव घोरपडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना