शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

‘निपाह’ व्हायरस येतोय.. सातारकरांनो सावधान! जिल्ह्यातही हायअलर्ट;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:47 IST

प्रशांत कोळी ।सातारा : ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील केरळमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण दगावले आहेत. कर्नाटकातही दोन रुग्ण आढळल्याने आता ‘निपाह’ हळूहळू अनेक राज्यांमध्येही पाय पसरत आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकला असून, सर्वच रुग्णालयांना अलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज ...

प्रशांत कोळी ।सातारा : ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील केरळमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण दगावले आहेत. कर्नाटकातही दोन रुग्ण आढळल्याने आता ‘निपाह’ हळूहळू अनेक राज्यांमध्येही पाय पसरत आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकला असून, सर्वच रुग्णालयांना अलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.

संसर्गजन्य असलेल्या या व्हायरसपासून सातारकरांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. केरळमधील कोझीकोड या जिल्ह्यात ‘निपाह’ने थैमान घातले आहे. आतापर्यंत व्हायरसने १३ जणांचा बळी घेतला आहे. यामुळे अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे पै-पाहुणे, नातेवाईक केरळ आणि कर्नाटकात वास्तव्यास आहेत किंवा पर्यटनासाठी जात असतात. त्यामुळे सातारकरांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे. वटवाघळांमळे हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने दक्षिण भारतातील लोकं पर्यटनासाठी सज्जनगड, कास, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. त्यावेळी रस्त्यावर बाजूला असणाऱ्या रानमेवा पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत. आंबा, जांभळे, करवंद आदी फळे पाहून आपोआप पावले थांबत आहेत. त्यामुळे फळे खाण्याचा मनसोक्त आनंदही ते घेत आहेत, अशा स्थितीत वेळी ‘निपाह’सारख्या हा विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण फळे खाल्ल्याने हा विषाणूचा फैलाव होऊन भीती पसरण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

वटवाघुळेही कच्ची ताडी, आंबा करवंदे, जांभूळ यासारख्या गोड पदार्थाकडे लवकर आकर्षित होतात. वटवाघुळे रात्री निघतात आणि जेव्हा झाडावरून ताडी भांड्यात पडते, त्यावेळी ते ताडी व आंबे खात असताना त्याच्या शरारातील व्हायरस संक्रमित होते.

सध्या आपण उन्हाळी सुटीसाठी सहलीच आयोजन करतो, बाहेर जाताना वाटेत आंबा, जांभूूळ, करवंदे अनेक प्रकारची उन्हाळी फळे खातो; पण ही फळे सरळ झाडाची वैगेरे खाऊ नये. सध्या विषाणू जीवघेणा ठरत आहे. यावर कोणती ही औषध लस तयार झालेली नाही, तरी गावी जाताना झाडावरून पडलेली आंबा, जांभळे, करवंद व इतर फळे खाऊ नये, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.विशेष म्हणजे, निपाहचा प्रभाव केवळ डिसेंबर आणि मे महिन्यात सर्वाधिक जाणवतो. कारण याच काळात आंबा, ताडी विक्री केली जातेय. गरमी व आद्रतेमुळे वटवाघुळे या वासाकडे आकर्षिक होतात. या जीवघेण्या व्हायरसबद्दल आतापर्यंत कुठलीही लस उपलब्ध झाली नाही, तसेच या विषाणूमुळे होणाºया संसर्गावर कोणतेही उपचार नाहीत.धोका नाही.. तरी अलर्ट राहा..केरळमध्ये संक्रमित झालेला निपाह व्हायरस जीवघेणा आहे, तसेच हा व्हायरस संसर्गजन्य आहे. महाराष्ट्राला या विषाणूपासून धोका नाही, असे सांगण्यात येत आहे. तरी हा व्हायरस कर्नाटकात आल्याने महाराष्ट्रातील सीमा भागात राहणाºयांमध्ये आता चिंतेत वाढ झाली आहे. याबाबत सातारकरांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. 

सध्या केरळ राज्यामध्ये ‘निपाह’ व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने ‘निपाह’ व्हायरसमुळे हायअलर्ट घोषित केला आहे. निपाहची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून तत्काळ उपचार घ्यावे.- श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmedicineऔषधं