शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘निपाह’ व्हायरस येतोय.. सातारकरांनो सावधान! जिल्ह्यातही हायअलर्ट;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:47 IST

प्रशांत कोळी ।सातारा : ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील केरळमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण दगावले आहेत. कर्नाटकातही दोन रुग्ण आढळल्याने आता ‘निपाह’ हळूहळू अनेक राज्यांमध्येही पाय पसरत आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकला असून, सर्वच रुग्णालयांना अलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज ...

प्रशांत कोळी ।सातारा : ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील केरळमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण दगावले आहेत. कर्नाटकातही दोन रुग्ण आढळल्याने आता ‘निपाह’ हळूहळू अनेक राज्यांमध्येही पाय पसरत आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकला असून, सर्वच रुग्णालयांना अलर्ट जारी केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.

संसर्गजन्य असलेल्या या व्हायरसपासून सातारकरांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. केरळमधील कोझीकोड या जिल्ह्यात ‘निपाह’ने थैमान घातले आहे. आतापर्यंत व्हायरसने १३ जणांचा बळी घेतला आहे. यामुळे अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे पै-पाहुणे, नातेवाईक केरळ आणि कर्नाटकात वास्तव्यास आहेत किंवा पर्यटनासाठी जात असतात. त्यामुळे सातारकरांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे. वटवाघळांमळे हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने दक्षिण भारतातील लोकं पर्यटनासाठी सज्जनगड, कास, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. त्यावेळी रस्त्यावर बाजूला असणाऱ्या रानमेवा पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत. आंबा, जांभळे, करवंद आदी फळे पाहून आपोआप पावले थांबत आहेत. त्यामुळे फळे खाण्याचा मनसोक्त आनंदही ते घेत आहेत, अशा स्थितीत वेळी ‘निपाह’सारख्या हा विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण फळे खाल्ल्याने हा विषाणूचा फैलाव होऊन भीती पसरण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

वटवाघुळेही कच्ची ताडी, आंबा करवंदे, जांभूळ यासारख्या गोड पदार्थाकडे लवकर आकर्षित होतात. वटवाघुळे रात्री निघतात आणि जेव्हा झाडावरून ताडी भांड्यात पडते, त्यावेळी ते ताडी व आंबे खात असताना त्याच्या शरारातील व्हायरस संक्रमित होते.

सध्या आपण उन्हाळी सुटीसाठी सहलीच आयोजन करतो, बाहेर जाताना वाटेत आंबा, जांभूूळ, करवंदे अनेक प्रकारची उन्हाळी फळे खातो; पण ही फळे सरळ झाडाची वैगेरे खाऊ नये. सध्या विषाणू जीवघेणा ठरत आहे. यावर कोणती ही औषध लस तयार झालेली नाही, तरी गावी जाताना झाडावरून पडलेली आंबा, जांभळे, करवंद व इतर फळे खाऊ नये, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.विशेष म्हणजे, निपाहचा प्रभाव केवळ डिसेंबर आणि मे महिन्यात सर्वाधिक जाणवतो. कारण याच काळात आंबा, ताडी विक्री केली जातेय. गरमी व आद्रतेमुळे वटवाघुळे या वासाकडे आकर्षिक होतात. या जीवघेण्या व्हायरसबद्दल आतापर्यंत कुठलीही लस उपलब्ध झाली नाही, तसेच या विषाणूमुळे होणाºया संसर्गावर कोणतेही उपचार नाहीत.धोका नाही.. तरी अलर्ट राहा..केरळमध्ये संक्रमित झालेला निपाह व्हायरस जीवघेणा आहे, तसेच हा व्हायरस संसर्गजन्य आहे. महाराष्ट्राला या विषाणूपासून धोका नाही, असे सांगण्यात येत आहे. तरी हा व्हायरस कर्नाटकात आल्याने महाराष्ट्रातील सीमा भागात राहणाºयांमध्ये आता चिंतेत वाढ झाली आहे. याबाबत सातारकरांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. 

सध्या केरळ राज्यामध्ये ‘निपाह’ व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने ‘निपाह’ व्हायरसमुळे हायअलर्ट घोषित केला आहे. निपाहची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून तत्काळ उपचार घ्यावे.- श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmedicineऔषधं