शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची आस कधी सोडून नका : नलवडे

By admin | Updated: January 21, 2015 23:53 IST

भुर्इंज येथील पारायण सोहळ्यात उलगडला शैक्षणिक जिद्दीचा प्रवास

भुर्इंज : ‘मला शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, वडिलांच्या निधनाने मला जुन्या अकरावीनंतर लग्न करावे लागले. लग्नानंतर शिकायचे होते; पण आमची सून कॉलेजात पाठविणार नाही, असा नातेवाइकांनी आग्रह धरला. पुढे शिक्षण सुरू होण्यासाठी दहा वर्षे गेली. त्या दहा वर्षांनंतर शिक्षणाची संधी मिळताच बीए, एम. ए. एम फील. करून आता लवकरच पीएच. डी. होईन, यातून सांगायचं काय तर शिक्षणाची आस कधी सोडू नका. शेळीसारखं जगू नका, कारण शेळीसारखे जगाल तर बळी जाल. त्यामुळे वाघासारखे जगा,’ असे आवाहन माजी आमदार कांता नलवडे यांनी भुर्इंज येथे केले. येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा विकृतांना फक्त फाशीची शिक्षा देऊन उपयोग होणार नाही. शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाला ज्या पद्धतीने धडा शिकवला, तसेच शासन व्हायला हवे. कारण असे रांझ्याचे पाटील आता गल्लोगल्ली झाले आहेत. यावेळी मुंबई महापालिकेच्या नगरसेविका समिता कांबळे, राजनंदा जाधवराव, नंदकुमार खामकर, पद्माताई भोसले, आदी उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. भैय्यासाहेब जाधवराव यांनी आभारमानले. (वार्ताहर)विविध क्षेत्रात महिलांना संधीज्येष्ठ कवी नायगावकर म्हणाले, ‘पूर्वीपेक्षा आज स्त्रियांना विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व गाजविण्याची संधी मिळत आहे. हा जो बदल आहे, त्या बदलासाठी महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी अंगावर दगड आणि शेणाचे गोळे झेलले आहे, ज्योतिबा फुलेंना जिवंतपणी स्वत:ची अंत्ययात्रा पाहावी लागली. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, अशा अनेकांच्या समाजसुधारणेचे प्रयत्न त्यासाठी कामी आले आहेत. यावेळी अशोक नायगावकर यांनी ठरलेली मानधनाची रक्कम नाकारून ती ज्ञानियांच्या चरणी अर्पण करत असल्याचे सांगितले. मुलांना योग्य वयात योग्य संस्कार मिळणे आवश्यक आहेत, तरच जीवनाची वादळवाट ते यशस्वी चालू शकतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी पारायण सोहळ्यात केले.