शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर

By admin | Updated: July 6, 2016 00:24 IST

अशोकराव गायकवाड : रामदास आठवले यांच्या निवडीने पक्षाला बळकटी

कऱ्हाड : ‘जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. मित्रपक्षासोबत काम करत असताना त्यांनी आम्हाला सतत नाराज केले आहे. मध्यंतरी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडीवेळीही मित्रपक्षांनी आम्हाला डावलले. त्यामुळे आता आगामी जिल्ह्यातील पालिका निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळात निवड झाल्यामुळे पक्षाला नवे बळ मिळाले आहे. जिल्ह्यात याचा जल्लोष साजरा केला जात आहे,’ अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद गायकवाड, मधुकर आठवले, अशोक मदने, नितीन आवळे, संतोष संपकाळ, आप्पासाहेब गायकवाड, एकनाथ रोकडे, सचिन वायदंडे आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतलेला निर्णय हा खरोखरच योग्य आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यातील दलित समाजबांधवांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आता निवडीमुळे त्यांना देशासाठी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे दलित बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सातारा येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे.
जिल्ह्यात आरपीआय पक्षाला बळकटी देण्यासाठी लवकरच कार्यकारीमध्ये बदल केले जाणार आहेत.
आरपीआयचे जिल्ह्यात सातारा, वाई, महाबळेश्वर, रहिमतपूर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहोत. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जागा निवडून आणणार आहे, अशी माहिती अशोकराव गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)