शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सातारा जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी-- सरकारकडून घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:15 IST

दरम्यान, शेतक-यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने कर्जमाफीची घोषणा सातत्याने केली जात आहे. २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर २००९ मध्ये वंचित राहिलेल्या शेतकºयांना राज्य शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली. २०१४, २०१७ मध्येही कर्जमाफीची घोषणा झाली.

ठळक मुद्दे२८१ कोटी रुपयांची थकबाकी शासन भरणार; नव्या योजनेमुळे आशा पल्लवीत

सागर गुजर ।सातारा : राज्य शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेची थकित कर्ज ठेवलेल्या तब्बल ६५ हजार २८९ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे शेतक-यांकडे थकित असलेले २८१ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यामध्ये ३८ बँकांच्या माध्यमातून शेतक-यांना कर्ज वाटप केले जाते. जिल्हा बँकेचा यामध्ये जवळपास ७० टक्के वाटा आहे. जिल्हा बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये २ लाख १ हजार शेतक-यांना १ हजार ९९ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटले. त्यातील २८१ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे हे कर्ज माफ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, कर्जमाफीचे निकष अद्याप बँकांना कळविण्यात आले नाहीत.

दरम्यान, शेतक-यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने कर्जमाफीची घोषणा सातत्याने केली जात आहे. २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर २००९ मध्ये वंचित राहिलेल्या शेतकºयांना राज्य शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली. २०१४, २०१७ मध्येही कर्जमाफीची घोषणा झाली.

२०१७ मध्ये शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अजूनही सुरू आहे. या योजनेचा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार शेतक-यांना लाभ मिळाला. या शेतकºयांचे ४४२ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले होते. आता नव्या योजनेमुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

इतर बँकांनाच मोठा लाभजिल्ह्यातील जिल्हा पीक कर्ज वसुली ९४ टक्के इतकी मोठी आहे. जिल्ह्यात ९५३ विकास सेवा सोसायट्या आहेत. तर जिल्हा बँकांच्या ३१९ शाखा आहेत. या दोन्हींच्या माध्यमातून कर्जाची वसुली केली जाते. कर्ज वसुलीची यंत्रणा मजबूत असल्याने वसुलीचे प्रमाण तब्बल ९४ टक्के इतकी मोठी आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्हा बँकेपेक्षा इतर बँकांनाच जास्त होण्याची शक्यता जास्त दिसते.

२ लाख ३५ हजार ३०४ शेतकरी कर्जबाजारी..बँक आॅफ महाराष्ट्र (अग्रणी बँक)च्या माध्यमातून सातारा जिल्ह्णातील ३८ बँका पीक कर्जाचे वाटप करतात. जिल्ह्णातील २ लाख ३५ हजार ३०४ शेतकऱ्यांना १ एप्रिल २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १ हजार ५७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

पूर्वी कर्जमाफी झालेल्यांना वगळणार?राज्य शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले. योजनेची अंमलबजावणी बँकांकडून अजूनही सुरू आहे. त्यातच आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाली आहे. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेचा लाभ मिळणार का? याची उत्सुकता आहे.

खरिपासह रब्बी हंगाम वाया गेल्याने जिल्ह्णातील शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जमाफीची अत्यंत गरज होती. शासनाने कर्जमाफी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.- संभाजी कदम, शेतकरीकर्जमाफी योजनेमुळे नियमित कर्ज भरणाºया शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरते. कर्जमाफीची योजना पतसंस्था तसेच इतर सहकारी बँकांकडून कर्ज घेणाºया शेतकरी व शेतमजुरांनाही दिली जाणे आवश्यक आहे.- माणिक पवार, शेतकरी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी