शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ऊसदराबाबत आळी मिळी गुप चिळी, बळीराजाचे कान निर्णयाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:22 PM

साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? याबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्देकारखान्यांत ऊस दराबाबत स्पर्धा फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांचे एकमेकांकडे लक्षऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

फलटण , दि. २७ :  साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? दराबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

फलटण तालुक्यात एक सहकारी आणि तीन खासगी कारखाने आहेत. यावेळी चारही कारखान्यांत दराबाबत स्पर्धा असेल; पण नीरा खोऱ्यातील इतर कारखान्यातही तालुक्यातील ऊस जातो. त्यामुळे इतर कारखाने काय दर देतात, याबाबत सर्वजण लक्ष ठेवून आहेत.राज्यात ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या शेतकरी संघटनांची ही केवळ वल्गना ठरतेय की काय, अशी परिस्थिती दिसत आहे.

मंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांबद्दल खरोखरच आस्था आहे की, एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी व आपली ताकद दाखविण्यासाठी आमचा वापर केला जाता आहे, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. दोघेही यंदा उसाचा पहिला हप्ता किंवा उसाचा दर किती दिला पाहिजे, हे जाहीर करीत नसल्याचे शेतकऱ्यांना स्पष्ट दिसत आहे.

सरकारने १ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यासाठी परवागनी देऊन यंदा साडेनऊ टक्के साखर उताऱ्यांस २ हजार ५५० एफआरपी जाहीर केली आहे. त्यामुळे पहिला हप्ता किमान त्यापेक्षा अधिक मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

अनेक कारखाने नियमाप्रमाणे एफआरपी देऊन मोकळे होतात. नंतर वाढीव दर देत नाहीत म्हणून शेतकरी संघटना एकाच वेळी उसाचा दर ठरवून मागत आहेत. परंतु कारखानदारांकडून कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. हे शेतकऱ्यांना अस्वस्थ करत आहे. दरांची कोंडी कोणता साखर कारखानदार फोडणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकरी संघटनेची भूमिकाही महत्त्वाचीऊसदर जाहीर होईल; पण तो दर साखर कारखानदार देणार का? असाही नंतर वादाचा मुद्दा असणार आहे. कारखान्याकडून दर पंधरवड्याचे ऊस बिल त्यांच्या पुढील आठवड्यानंतर दिले जाते. त्यामुळे १ नोंव्हेबरला कारखाने सुरू झाले तर २१ नोव्हेबरपर्यंत पहिला हप्ता किती द्यायचा, हे ठरवता येणार आहे. कदाचित त्यामुळे शेतकरी संघटना काय भूमिका घेते? हे पाहून हप्त्याचे पाहू या विचारातून कारखान्याच्या गोटातून शांतता पाहायला मिळते.

टॅग्स :FarmerशेतकरीSadabhau Khotसदाभाउ खोत