शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीतील रानमेवा लागला खुणावू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री झाडावर चढणं, काळी मैना, जांभळं, आंबुळगी, तोरणं, अस्सल रानमेवा खाणं खेड्यातील मुलांना सहज शक्य आहे; ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेट्री

झाडावर चढणं, काळी मैना, जांभळं, आंबुळगी, तोरणं, अस्सल रानमेवा खाणं खेड्यातील मुलांना सहज शक्य आहे; पण शहरी संस्कृतीतून ते हद्दपार होऊ लागले आहे. कास, बामणोली, परिसरांत अंबुळगी पिकण्यास सुरुवात झाली असून सातारा, जावली तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडून रानमेवा बाजारात काहीच दिवसात विक्रीसाठी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिमेंटच्या जंगलांतील मुलांची हौस फिटणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. या रानमेव्याचा आस्वाद पर्यटकांबरोबरच सातारा, महाबळेश्वरसारख्या बाजारपेठेत येणारेही उन्हाळ्यात घेत असतात. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगार मिळतो.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील डोंगररांगांमध्ये पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्‍चिम घाट माथ्यावर तोरणे, आंबुळगी, करवंदे, जांभूळ, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यापासून मे ते जूनपर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतो. हा रानमेवा बाजारपेठेत पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतो. परिसरात फिरावयास येणारे अनेक पर्यटक रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसतात. वेली, झुडपात येणारे अंबुळगी हे फळ फेब्रुवारी-मार्चमध्ये पिकण्यास सुरुवात होते. त्यानंतर तोरणे, जांभूळ, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. तोरणे हे काटेरी झुडपाला येणारे एकबीजवर्गीय फळ. त्याची कच्ची फळेही येण्यास सुरुवात होत आहे. हे फळ पांढऱ्या रंगाचे असून चवीला गोड व साधारण तुरट असते. फळाचा आकार लहान मण्याएवढा असतो. तसेच अनेक ठिकाणी करवंदांना मोहर येऊन कच्ची करवंदे तयार होऊ लागली आहेत.

कोयनानगर, हेळवाक, नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग, जावळी तालुक्यातील कास- बामणोली व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागांतील बहुसंख्य शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात आंबुळगी, तोरणे, करवंदे, जांभूळ यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात.

चौकट

पारंबे फाटा ते एकीव मार्गावर काही ठिकाणी वणवा लागून बहुतांश अंबुळगी रानमेवा नष्ट झाला आहे. वणव्यामुळे रानमेवा नष्ट होऊन विक्रेत्यांना आर्थिक झळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे वणवा लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

कोट

अंबुळगी हे फळ काही प्रमाणावर पिकण्यास सुरुवात झाली आहे. निसर्गाने साथ दिल्यास रानफळे नक्कीच येथील स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध करून देतील. तसेच वणवा लावू नये. वणव्याने हा सर्व रानमेवा नष्ट होऊ शकतो.

- विकास आखाडे, कुसुंबीमुरा