शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील नेत्यांच्या सत्कारांना कवठेकरांनी दिला नारळ

By admin | Updated: April 26, 2015 01:02 IST

गावबैठकीत निर्णय : गावाने सक्तीने निर्णय पाळण्याच्या सूचना

विनोद पोळ / कवठे कोणतेही शुभकार्य असले की त्यात गावातील मान्यवरांचा सत्कार समारंभ घेतला जातो. सोहळा लग्नाचा पण विधी बाजूला ठेवून, वऱ्हाडी मंडळीला अक्षता हातात घेऊन ताटकळवत बसवून गावपुढाऱ्यांचा हारतुरे, नारळ देऊन सत्कार करण्याचे फॅड अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. आपल्या शुभकार्यात किती मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली याचा आनंद कार्यमालकाला होत असला तरी इतरांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. लग्नकार्यात सर्वांना मान मिळावा, यासाठी कवठे गावात ग्रामस्थांनी ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावची यात्रा संपल्यानंतर संपूर्ण वर्षभराच्या हिशोबाची बैठक घेतली जाते व हिशोब वाचनानंतर गावातील महत्त्वाच्या सामाजिक हिताच्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जे निर्णय घेण्यास ग्रामपंचायतीला अडचणीचे ठरू शकते, असे बहुतेक सर्व निर्णय गावबैठकीत घेतले जातात व ते गावास बंधनकारक असतात. यंदाच्या गावबैठकीत हिशोब वाचन झाल्यानंतर एका असाच क्रांतिकारक निर्णयासंदर्भात चर्चा करण्यात आली. कोणाचेही लग्नकार्य असले की गावातील प्रत्येक संस्थेचे आजी, माजी पदाधिकारी यांचा नामोल्लेख करून त्यांना श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्याची परंपरा बहुतेक विवाहसोहळ्यात पाळतात. या विषयावर चर्चा होऊन लग्न समारंभात येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या समारंभातील महत्वाची आहे. सर्वांचाच सत्कार टाळला तर सर्वाना समान वागणूक मिळेल, असा गावबैठकीत निर्णय झाला. गावकारभाऱ्याची नेमणूक कवठे, ता. वाई हे राजकीय दृष्ट्या पुढारलेले गाव. येथे ग्रामपंचायत स्वतंत्र कारभार करते तर त्याला समांतर अशा पद्धतीने गावकारभार चालतो. भैरवनाथाच्या यात्रेपूर्वी दोन वर्षासाठी गावकारभाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण वर्षभर गावाचा कारभार चालविला जातो.