शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ंसायकलवरून तेरा दिवसांत १४०० किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:03 AM

मायणी : येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य विजय वरुडे व शिवाजी कणसे यांच्यासह मिरज व पुणे येथील चौघांनी सायकलवरून तेरा दिवसांत १,४०० किलोमीटरचा प्रवास केला. सायकलवर ‘ पर्यावरण वाचवा , प्रदूषणाला आळा घाला,’ यासारखे संदेश लिहून समाजप्रबोधनही केले.कन्याकुमारीला जाण्यासाठी आठरा दिवसांपूर्वी सायकलवरून प्रस्थान केले होते. हे आंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींवरून ...

मायणी : येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य विजय वरुडे व शिवाजी कणसे यांच्यासह मिरज व पुणे येथील चौघांनी सायकलवरून तेरा दिवसांत १,४०० किलोमीटरचा प्रवास केला. सायकलवर ‘पर्यावरण वाचवा, प्रदूषणाला आळा घाला,’ यासारखे संदेश लिहून समाजप्रबोधनही केले.कन्याकुमारीला जाण्यासाठी आठरा दिवसांपूर्वी सायकलवरून प्रस्थान केले होते. हे आंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींवरून तेरा दिवस लागले. या दिवसामध्ये बेंगलोर, मदुराई, सेलमयासह दक्षिण भारतात व्यवसायानिमित्त असलेल्या मराठी माणसांनी त्यांचे स्वागत केले.केवळ सायकल चालवून हा विक्रम करण्याचा उद्देश न ठेवता वाहनांमुळे प्रदूषण होत आहे. पर्यावरणाचाही ºहास होत चालला आहे. ‘सायकल चालवा पर्यावरणाचा समतोल राखा,’ असे विविध संदेश सायकलवर लिहिले होते. परतीचा प्रवास रेल्वेने करून ते शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मायणी येथे पोहोचले. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत हार, बुफे देऊन मिठाई भरवून स्वागत केले.अनिल कुलकर्णी, अंबरीश जोशी, मिलिंद कुलकर्णी, सागर माळवदे या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे चार सदस्यही आहेत. कन्याकुमारी येथे गेल्यानंतर स्वामी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी मंदिर त्यानंतर रामेश्वरम् येथील धनुष्यकोटी हे रामसेतू बांधलेले ठिकाण, मीनाक्षी मंदिर येथे दर्शन घेऊन कन्याकुमारी ते मिरज हा प्रवास रेल्वेने केला. मिरज येथेही तेथील सायकल व पर्यावरणप्रेमी ग्रुप, सह्याद्री ग्रुप तर्फे शाल श्रीफळ गुलाबपुष्प व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.मायणीत उपसरपंच सूरज पाटील, वडूज बाजार समितीचे संचालक किरण देशमुख, किरण कवडे, रणजित माने, हेमंत जाधव, शंकर माळी, चंदन वरुडे, राजेंद्र बाबर, राजाराम कचरे, शंकर भिसे, कृषी अधिकारी दीपक घोणे, सोमनाथ माळी, जयंत लिपारे, मधुकर लिपारे, आबासाहेब माने, सचिन घाडगे, प्रशांत कवडे, प्रमोद महामुनी, डॉ. सुमनकुमार देवनाथ, अश्विन माळी, अशोक कुंबलवर, जगन्नाथ भिसे यांनी स्वागत केले.इतर सायकलस्वारांनी घेतली भेटगतवर्षी मायणी ते बालाजी हे अंतर कमी वेळात पार करून मायणीचा रायडर अशी प्रसिद्धी मिळवलेले पत्रकार सुमित ऊर्फ दत्ता कोळी व शाम कवडे यांनी यावर्षी मायणी ते कन्याकुमारी हे १४०० किलोमीटरचे अंतर पार करून या सायकलस्वारांची प्रत्यक्ष कन्याकुमारीत भेट घेतली.