शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

पुन्हा पायपीट ठरलेली...पाऊस उठतोय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

सातारा : पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचे साहित्य घरात भरून ठेवणाऱ्या पळसावडे, मोरबाग, बोंडारवाडी आणि सांडवलीतील लोक गेल्या काही ...

सातारा : पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचे साहित्य घरात भरून ठेवणाऱ्या पळसावडे, मोरबाग, बोंडारवाडी आणि सांडवलीतील लोक गेल्या काही वर्षांपासून थोडे निर्धास्त झाले होते. गावापर्यंत येणाऱ्या रस्त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. पण, पुन्हा यावर्षी पावसाने दिलासा देणारा हा रस्ताच वाहून नेला आणि पुन्हा या भागातील लोकांना पहिले दिवस आठवले. सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील पळसावडे आणि त्यापुढील गावांना जाणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे आता या लोकांना जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी २० ते २५ किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.

सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या पळसावडे, बोंडारवाडी आणि सांडवली या गावांना जाणारा रस्ता या पावसात रस्ता खचला आहे. घाटमाथ्यावरच रस्ता खचल्याने नवीन रस्ता करणे अवघड झाले आहे. या गावांना आता पर्यायी रस्त्याची आवश्यकता आहे. १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला आणि या गावांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आपल्या आमदार फंडातून रस्ते बनविले. त्यामुळे लोकांची सोय झाली होती. पण, या पावसात पुन्हा हे रस्ते धुऊन गेले. रस्त्यावरची खडी सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. डोंगराचा भागच खचल्यामुळे रस्त्यासह मोठा भाग दरीत कोसळला आहे. अशा परिस्थितीत आता लवकर रस्ता होणे अवघड दिसत आहे.

रस्ता वाहून गेल्यानंतर आमदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. मात्र, तातडीच्या उपाययोजना करण्यासाठीही काही दिवस जाणार आहेत. तोपर्यंत या गावांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आता खचून गेलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूने किमान गाडी जाईल, असा रस्ता करण्याची अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत. पण, पावसात तो टिकणार का अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्याने या गावांचा संपर्काचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली आहे. नोकरदार आणि गावातून ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली असून, त्यांना अलीकडे गाडी ठेवून पलीकडे पायी चालत जावे लागत आहे. तर पलीकडच्या बाजूला असलेल्या लोकांच्या गाड्या त्याच बाजूला अडकून पडल्या आहेत.

चौकट

पावसाळ्यातील आपत्ती ठरलेलीच

पावसाळ्यात या परिसरात रस्ता खचणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटना ठरलेल्याच असतात. पण, यावर्षी कमी कालावधीत झालेला प्रचंड पाऊस सर्वांसाठीच अडचणीचा ठरलेला आहे. २४ तासांत कोयना धरणात वाढलेले १७ टीएमसी पाणी याचेच प्रत्यंतर आहे. अजूनही या भागात पाऊस सुरू आहे. हा पाऊस थांबल्यानंतरच आता याठिकाणच्या पायाभूत सुविधा पुन्हा पुनर्स्थापित करता येणार आहेत.

कोट

पळसावडे आणि बोंडारवाडीच्या लोकांसाठी पर्यायी रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्या ठिकाणची परिस्थिती स्वत: जाऊन पाहून आलो आहे. त्यांच्या अडचणीबाबतही कल्पना आहे. काही दिवसांतच त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग होईल आणि वाहून गेलेला मार्गही दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लोकांची अडचण होणार नाही अशी व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल.

शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार