शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

पुन्हा पायपीट ठरलेली...पाऊस उठतोय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

सातारा : पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचे साहित्य घरात भरून ठेवणाऱ्या पळसावडे, मोरबाग, बोंडारवाडी आणि सांडवलीतील लोक गेल्या काही ...

सातारा : पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचे साहित्य घरात भरून ठेवणाऱ्या पळसावडे, मोरबाग, बोंडारवाडी आणि सांडवलीतील लोक गेल्या काही वर्षांपासून थोडे निर्धास्त झाले होते. गावापर्यंत येणाऱ्या रस्त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. पण, पुन्हा यावर्षी पावसाने दिलासा देणारा हा रस्ताच वाहून नेला आणि पुन्हा या भागातील लोकांना पहिले दिवस आठवले. सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील पळसावडे आणि त्यापुढील गावांना जाणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे आता या लोकांना जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी २० ते २५ किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.

सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या पळसावडे, बोंडारवाडी आणि सांडवली या गावांना जाणारा रस्ता या पावसात रस्ता खचला आहे. घाटमाथ्यावरच रस्ता खचल्याने नवीन रस्ता करणे अवघड झाले आहे. या गावांना आता पर्यायी रस्त्याची आवश्यकता आहे. १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला आणि या गावांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आपल्या आमदार फंडातून रस्ते बनविले. त्यामुळे लोकांची सोय झाली होती. पण, या पावसात पुन्हा हे रस्ते धुऊन गेले. रस्त्यावरची खडी सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. डोंगराचा भागच खचल्यामुळे रस्त्यासह मोठा भाग दरीत कोसळला आहे. अशा परिस्थितीत आता लवकर रस्ता होणे अवघड दिसत आहे.

रस्ता वाहून गेल्यानंतर आमदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. मात्र, तातडीच्या उपाययोजना करण्यासाठीही काही दिवस जाणार आहेत. तोपर्यंत या गावांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आता खचून गेलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूने किमान गाडी जाईल, असा रस्ता करण्याची अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत. पण, पावसात तो टिकणार का अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्याने या गावांचा संपर्काचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली आहे. नोकरदार आणि गावातून ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली असून, त्यांना अलीकडे गाडी ठेवून पलीकडे पायी चालत जावे लागत आहे. तर पलीकडच्या बाजूला असलेल्या लोकांच्या गाड्या त्याच बाजूला अडकून पडल्या आहेत.

चौकट

पावसाळ्यातील आपत्ती ठरलेलीच

पावसाळ्यात या परिसरात रस्ता खचणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटना ठरलेल्याच असतात. पण, यावर्षी कमी कालावधीत झालेला प्रचंड पाऊस सर्वांसाठीच अडचणीचा ठरलेला आहे. २४ तासांत कोयना धरणात वाढलेले १७ टीएमसी पाणी याचेच प्रत्यंतर आहे. अजूनही या भागात पाऊस सुरू आहे. हा पाऊस थांबल्यानंतरच आता याठिकाणच्या पायाभूत सुविधा पुन्हा पुनर्स्थापित करता येणार आहेत.

कोट

पळसावडे आणि बोंडारवाडीच्या लोकांसाठी पर्यायी रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्या ठिकाणची परिस्थिती स्वत: जाऊन पाहून आलो आहे. त्यांच्या अडचणीबाबतही कल्पना आहे. काही दिवसांतच त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग होईल आणि वाहून गेलेला मार्गही दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लोकांची अडचण होणार नाही अशी व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल.

शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार