शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा पायपीट ठरलेली...पाऊस उठतोय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

सातारा : पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचे साहित्य घरात भरून ठेवणाऱ्या पळसावडे, मोरबाग, बोंडारवाडी आणि सांडवलीतील लोक गेल्या काही ...

सातारा : पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांचे साहित्य घरात भरून ठेवणाऱ्या पळसावडे, मोरबाग, बोंडारवाडी आणि सांडवलीतील लोक गेल्या काही वर्षांपासून थोडे निर्धास्त झाले होते. गावापर्यंत येणाऱ्या रस्त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. पण, पुन्हा यावर्षी पावसाने दिलासा देणारा हा रस्ताच वाहून नेला आणि पुन्हा या भागातील लोकांना पहिले दिवस आठवले. सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील पळसावडे आणि त्यापुढील गावांना जाणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे आता या लोकांना जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठी २० ते २५ किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.

सातारा तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या पळसावडे, बोंडारवाडी आणि सांडवली या गावांना जाणारा रस्ता या पावसात रस्ता खचला आहे. घाटमाथ्यावरच रस्ता खचल्याने नवीन रस्ता करणे अवघड झाले आहे. या गावांना आता पर्यायी रस्त्याची आवश्यकता आहे. १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला आणि या गावांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आपल्या आमदार फंडातून रस्ते बनविले. त्यामुळे लोकांची सोय झाली होती. पण, या पावसात पुन्हा हे रस्ते धुऊन गेले. रस्त्यावरची खडी सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. डोंगराचा भागच खचल्यामुळे रस्त्यासह मोठा भाग दरीत कोसळला आहे. अशा परिस्थितीत आता लवकर रस्ता होणे अवघड दिसत आहे.

रस्ता वाहून गेल्यानंतर आमदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. मात्र, तातडीच्या उपाययोजना करण्यासाठीही काही दिवस जाणार आहेत. तोपर्यंत या गावांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. आता खचून गेलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूने किमान गाडी जाईल, असा रस्ता करण्याची अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत. पण, पावसात तो टिकणार का अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्याने या गावांचा संपर्काचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली आहे. नोकरदार आणि गावातून ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली असून, त्यांना अलीकडे गाडी ठेवून पलीकडे पायी चालत जावे लागत आहे. तर पलीकडच्या बाजूला असलेल्या लोकांच्या गाड्या त्याच बाजूला अडकून पडल्या आहेत.

चौकट

पावसाळ्यातील आपत्ती ठरलेलीच

पावसाळ्यात या परिसरात रस्ता खचणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटना ठरलेल्याच असतात. पण, यावर्षी कमी कालावधीत झालेला प्रचंड पाऊस सर्वांसाठीच अडचणीचा ठरलेला आहे. २४ तासांत कोयना धरणात वाढलेले १७ टीएमसी पाणी याचेच प्रत्यंतर आहे. अजूनही या भागात पाऊस सुरू आहे. हा पाऊस थांबल्यानंतरच आता याठिकाणच्या पायाभूत सुविधा पुन्हा पुनर्स्थापित करता येणार आहेत.

कोट

पळसावडे आणि बोंडारवाडीच्या लोकांसाठी पर्यायी रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्या ठिकाणची परिस्थिती स्वत: जाऊन पाहून आलो आहे. त्यांच्या अडचणीबाबतही कल्पना आहे. काही दिवसांतच त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग होईल आणि वाहून गेलेला मार्गही दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लोकांची अडचण होणार नाही अशी व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल.

शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार