शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर अस्मानीबरोबरच वन्य संकटही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:00 IST

जंगले संपुष्टात येवू लागल्याने वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान मानववस्ती होवू लागली आणि त्यानंतर वन्यप्राणी आणि मानव संघर्षाला सुरूवात झाली.

प्रगती जाधव-पाटील 

सातारा - वन्यजीवांच्या अधिवासात मानवाचा शिरकाव वाढला. जंगले संपुष्टात येवू लागल्याने वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान मानववस्ती होवू लागली आणि त्यानंतर वन्यप्राणी आणि मानव संघर्षाला सुरुवात झाली. ताज्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यात राज्यातील १२ व्यक्तींचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, तर ८ हजार ८४५ जणांच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसार झाल्याचे उघड झाले आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये मनुष्य आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष आता नित्याचा झाला आहे. वनक्षेत्रात भक्ष मिळेपर्यंत वन्यप्राणी जंगलात फिरून शिकार करणं पसंत करतात. वन क्षेत्रात अन्नाची उपलब्धता नसल्याने शिकार आणि पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राणी जंगल सोडून मानववस्तीकडे वळतात. मुळातच वन्यक्षेत्रात केलेले अतिक्रमण, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांमुळे वन्यप्राणी मानवाचे शेजारी म्हणूनच वावरताना दिसतात.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगराशेजारी शेतात बसून काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ले केले आहेत. खाली बसलेले मानव भक्ष समजून हा हल्ला होतो. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक ठिकाणी रानडुकरांकडून शेतीचे नुकसान केले जाते. उभ्या पिकात रानडुकरांची टोळी शिरली तर त्यांच्या पायाने ते पूर्ण शेतातील धान्याचे नुकसान करतात. या टोळीला हुसकावून बाहेर काढणंही शेतकऱ्यांना मुश्किल होते. रानडुकरांमुळे भात शेतीला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे यात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाच्या अवघ्या वीस टक्केच भरपाई मिळते.

वन्य प्राण्यांमुळे हानी (३१ जुलै अखेर राज्यातील आकडेवारी)

१३३ व्यक्तींवर वन्य प्राण्यांचा हल्ला

१२ व्यक्तींचा प्राणी हल्ल्यात मृत्यू

२८ पाळीव प्राण्यांवर जिवघेणा हल्ला

२,५०६ पाळीव प्राण्यांचा वन्य जीव प्राणी हल्ल्यात मृत्यू

८,८४५ जणांच्या शेतींचे वन्यप्राण्यांकडून नुकसान

पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मोरांचाही त्रास सोसावा लागतो. शेतात पेरलेले धान्य हे मोराचे खाद्य ठरते. तर शेतातील भुईमुग उपटून त्याच्या शेंगा खाणारी माकडं आणि बटाटा, मुळा, गाजर आदी जमिनीतील पिकं जमीन भुसभूशीत करून खाणारे साळिंदर यांनी केलेले नुकसान वन विभागाच्या नोंदीतच नाही.

वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास अशी मिळते आर्थिक मदत

नुकसान भरपाईसाठी शासननिर्णय ११ जुलै २०१८ रोजी झाला. त्यानंतर त्यात २८ नोव्हेंबर २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या वारसाला १० लाखाऐवजी १५ लाख रुपये देण्याची दुरूस्ती करण्यात आली.

शेतीचे नुकसान - पिकाच्या उत्पादकतेवर सरासरी ८०० रुपये गुंठा या दराने मोबदला दिला जातो.

पाळीव प्राणी मृत्यू - गायी, म्हेशी, बैल ६० हजार किंवा बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम

शेळी मेंढी १० हजार किंवा बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम

मनुष्य मृत्यू - १५ लाख रूपयांपर्यंत वारसांना मोबदला

मनुष्य किरकोळ जखमी - २० हजार किंवा औषधोपचाराचा संपूर्ण खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल ती

मनुष्य कायम अपंगत्व - पाच लाख रुपये

मनुष्य गंभीर जखमी - सव्वा लाखापर्यंत खर्च

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना किंवा शेतीचं नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे केले जातात. त्यानंतर शासकीय निकषांनुसार संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाते.

- सचिन डोंबाळे, वनक्षेत्रपाल, फिरते पथक, सातारा 

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण