शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
2
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
3
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
4
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
5
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
6
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
7
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
8
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
9
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
10
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
11
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
12
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
13
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
14
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
15
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
16
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
17
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
18
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
19
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
20
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो

शेतकऱ्यांवर अस्मानीबरोबरच वन्य संकटही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 1:30 PM

जंगले संपुष्टात येवू लागल्याने वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान मानववस्ती होवू लागली आणि त्यानंतर वन्यप्राणी आणि मानव संघर्षाला सुरूवात झाली.

प्रगती जाधव-पाटील 

सातारा - वन्यजीवांच्या अधिवासात मानवाचा शिरकाव वाढला. जंगले संपुष्टात येवू लागल्याने वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान मानववस्ती होवू लागली आणि त्यानंतर वन्यप्राणी आणि मानव संघर्षाला सुरुवात झाली. ताज्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यात राज्यातील १२ व्यक्तींचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, तर ८ हजार ८४५ जणांच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसार झाल्याचे उघड झाले आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये मनुष्य आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष आता नित्याचा झाला आहे. वनक्षेत्रात भक्ष मिळेपर्यंत वन्यप्राणी जंगलात फिरून शिकार करणं पसंत करतात. वन क्षेत्रात अन्नाची उपलब्धता नसल्याने शिकार आणि पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राणी जंगल सोडून मानववस्तीकडे वळतात. मुळातच वन्यक्षेत्रात केलेले अतिक्रमण, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांमुळे वन्यप्राणी मानवाचे शेजारी म्हणूनच वावरताना दिसतात.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगराशेजारी शेतात बसून काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ले केले आहेत. खाली बसलेले मानव भक्ष समजून हा हल्ला होतो. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक ठिकाणी रानडुकरांकडून शेतीचे नुकसान केले जाते. उभ्या पिकात रानडुकरांची टोळी शिरली तर त्यांच्या पायाने ते पूर्ण शेतातील धान्याचे नुकसान करतात. या टोळीला हुसकावून बाहेर काढणंही शेतकऱ्यांना मुश्किल होते. रानडुकरांमुळे भात शेतीला मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे यात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाच्या अवघ्या वीस टक्केच भरपाई मिळते.

वन्य प्राण्यांमुळे हानी (३१ जुलै अखेर राज्यातील आकडेवारी)

१३३ व्यक्तींवर वन्य प्राण्यांचा हल्ला

१२ व्यक्तींचा प्राणी हल्ल्यात मृत्यू

२८ पाळीव प्राण्यांवर जिवघेणा हल्ला

२,५०६ पाळीव प्राण्यांचा वन्य जीव प्राणी हल्ल्यात मृत्यू

८,८४५ जणांच्या शेतींचे वन्यप्राण्यांकडून नुकसान

पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मोरांचाही त्रास सोसावा लागतो. शेतात पेरलेले धान्य हे मोराचे खाद्य ठरते. तर शेतातील भुईमुग उपटून त्याच्या शेंगा खाणारी माकडं आणि बटाटा, मुळा, गाजर आदी जमिनीतील पिकं जमीन भुसभूशीत करून खाणारे साळिंदर यांनी केलेले नुकसान वन विभागाच्या नोंदीतच नाही.

वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास अशी मिळते आर्थिक मदत

नुकसान भरपाईसाठी शासननिर्णय ११ जुलै २०१८ रोजी झाला. त्यानंतर त्यात २८ नोव्हेंबर २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या वारसाला १० लाखाऐवजी १५ लाख रुपये देण्याची दुरूस्ती करण्यात आली.

शेतीचे नुकसान - पिकाच्या उत्पादकतेवर सरासरी ८०० रुपये गुंठा या दराने मोबदला दिला जातो.

पाळीव प्राणी मृत्यू - गायी, म्हेशी, बैल ६० हजार किंवा बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम

शेळी मेंढी १० हजार किंवा बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम

मनुष्य मृत्यू - १५ लाख रूपयांपर्यंत वारसांना मोबदला

मनुष्य किरकोळ जखमी - २० हजार किंवा औषधोपचाराचा संपूर्ण खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल ती

मनुष्य कायम अपंगत्व - पाच लाख रुपये

मनुष्य गंभीर जखमी - सव्वा लाखापर्यंत खर्च

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना किंवा शेतीचं नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे केले जातात. त्यानंतर शासकीय निकषांनुसार संबंधितांना नुकसान भरपाई दिली जाते.

- सचिन डोंबाळे, वनक्षेत्रपाल, फिरते पथक, सातारा 

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण