शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

बारशाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा : ग्रामीण भागातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:56 PM

बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

ठळक मुद्देनव्या पिढीला स्वातंत्र्याची महती समजावी म्हणून पाळण्याच्या रुपाने आठवणी जागवतायत; महिलांचे कौतुक

दशरथ ननावरे।खंडाळा : बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शौर्य कथांच्या आठवणींना ग्रामीण भागात आजही लहान मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमातून उजाळा दिला जातोय.

मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोळा संस्कारांना विशेष महत्त्व आहे. या प्रत्येक संस्कारावेळी आपल्या वेगळ्या संस्कृती अनुभवायला मिळतात. असाच एक महत्त्वपूर्ण संस्कार म्हणजे बाळाचे बारसे.१९४२ चा स्वातंत्र्य लढा, महात्मा गांधीजींचा सत्याग्रह, तुरुंगवास, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेनेची स्थापना करून दिलेला लढा, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भूमिगत होऊन प्रतिसरकार स्थापन केले.

मात्र त्यांच्या कार्यशैलीने ते प्रतिसरकार नावाने प्रसिद्ध झाले. यांसह जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अरुणा देवी आदी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रज सरकार विरोधात उठाव करून आगगाडी बंद करणे, कोर्ट कचेरी, पोस्ट आॅफिस बंद पाडणे, गोऱ्या साहेबाला अडवणे यासारख्या घटनांचा उजाळा देत गोरगरिबांवर अन्याय कसा हटवला जात होता. स्वातंत्र्यसाठी क्रांतिकारकांचे योगदान व प्राणार्पण यांचे हुबेहूब वर्णन बारशाच्या कार्यक्रमातून पाळणा म्हणताना आजही केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.हे ऐकूण अंगावर शहारा उभा राहतो. वृद्ध महिलांनी या स्मृती जागृत ठेवल्या आहेत. ग्रामीण भागातील अशा कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शनही घडते. 

आमच्या लहानपणापासून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी योगदान दिले त्यांच्या कार्यस्मृतींना उजाळा पाळण्याच्या रुपाने ऐकत आलो आहोत. ही रुढी परंपरा पुढील काळातही सुरू राहिली पाहिजे. याद्वारे नव्या पिढीला किमान स्वातंत्र्याची महती समजेल.- ताराबाई शिंदे, म्हावशी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास