शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्री फोफावली... सुशिक्षित तरुणाई बिघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST

कातरखटाव : मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचा फायदा घेत पडळ, कारखाना स्थळ, एनकूळ, बनपुरी, बोंबाळे या परिसरातील ...

कातरखटाव : मार्च महिन्यापासून लॉकडाऊनचा फायदा घेत पडळ, कारखाना स्थळ, एनकूळ, बनपुरी, बोंबाळे या परिसरातील खेड्यापाड्यात दारू व्यवसाय फोफावला आहे. चोरीचोरी-चुपकेचुपके कुठेही दारू मिळू लागल्यामुळे तरुणाई व्यसनाकडे वळत आहे. प्रशासनाने अवैध दारू विक्रेत्यांना लगाम घालण्याची मागणी होत आहे.

कोरोनाने वर्षभर गावोगावी पाय पसरले आहेत. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले. कातरखटावसह परिसरात तळीराम दारू विकून मोकळ्या बाटल्या राजरोसपणे कुठेही फेकत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. वयोगट न पाहता तळीराम कुणालाही दारू विकू लागल्यामुळे ऐन तारुण्यात युवक अधिकच गुरफटू लागला आहे. यामुळे पैसे, वर्चस्वाचा वाद, राजकारणातून मारामारी, भाऊबंदकी, मौजमजेसाठी चोऱ्या केल्या जात आहेत. कमी वयात पैसा आल्यामुळे तरुणाई वाईट मार्गाकडे वळलेली दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात तरुण जास्त प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत. नंतर गरजा पूर्ण करण्यासाठी मटका किंवा अवैध मार्ग अवलंबताना दिसत आहेत.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागल्यानंतर जनजीवन, आर्थिक घडी कोलमडली असताना, या काळात उद्योगधंदे बंद होते. त्यावेळी ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्री वाढली. कमी वेळात दुप्पट पैसा मिळू लागल्यामुळे अनेक मद्यपींचे अड्डे माळरानात, शेतात सुरू झाले.

कोट

वाढत्या वयात व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मुलांचे मार्ग बदलून जातात. प्रतिष्ठा ढासळल्यामुळे समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांच्याकडे सहजरित्या बोट दाखवले जाते. त्यामुळे बहुतेकवेळा सुधारण्याऐवजी गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका वाढतो.

- आनंदराव बागल,

ज्येष्ठ नागरिक, कातरखटाव

चौकट

मानसिक संतुलनावर परिणाम

शारीरिक, मानसिक संतुलन बिघडणे या दोन्हीवर परिणाम होऊन भवितव्य अंधारात राहणार आहे. या प्रवाहात गेल्यामुळे शिक्षणाची लिंक तुटत जाणार आहे. मुलांची पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होत नाही. यातून बाहेर पडणे अवघड होत जाते.

- डॉ. एन. ए. मोहिते,

कातरखटाव

२०कातरखटाव

कातरखटाव परिसरातील शेतात, माळरानात, इतरत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या जात आहेत. (छाया : विठ्ठल नलवडे)