शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

इचलकरंजीत पंचगंगा नदी पुन्हा बनतेय गटारगंगा

By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST

प्रदूषण प्रश्न : उपसा बंद करावा लागणार; पाणीटंचाईची भीती; आगामी सहा महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन होण्याची गरज

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली असून, पाण्यात मिसळणारे सांडपाणी आणि कचरा यामुळे पाण्यास दुर्गंधी येऊ लागली आहे. दरवर्षीप्रमाणे नदीतील पाणी प्रदूषित होऊन नगरपालिकेस पुन्हा पाण्याचा उपसा बंद करावा लागणार आहे. आगामी सहा महिने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.दरवर्षी पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावते. त्याचबरोबर ग्रामीण परिसराबरोबर इचलकरंजीतील यशोदा नाला व काळा ओढा यातून सांडपाणी नदीपात्रात येते. त्याचबरोबर नागरिकांनी नदीच्या पाण्यात टाकलेले निर्माल्य, कचरा, आदी कुजल्याने नदीतील पाणी काळे पडते व त्याला दुर्गंधी येते. यंदाही येथील पंचगंगा नदीत तेच घडते आहे. त्यातच नागरिकांनी धुतलेली जनावरे व कपडे धुण्याची भर पडत आहे.अशा पार्श्वभूमीवर राधानगरी किंवा काळम्मावाडी धरणातून सोडलेल्या पाण्याबरोबर कोल्हापूर व ग्रामीण परिसरातील सांडपाणी वाहत येते. त्याचा परिणाम म्हणून येथील नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. असे पाणी पालिकेच्या शुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले तरी त्याचा काळसर रंग व दुर्गंधी कमी होत नाही. अखेर नगरपालिकेला पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा बंद करावा लागतो आणि कृष्णा नदीतील पाणी उपशावरच अवलंबून राहावे लागते. याचा परिणाम म्हणून सध्या तीन दिवसांतून एकवेळ मिळणारे पाणी पाच दिवसांतून एक वेळ मिळते. एकूणच शहरवासीयांना पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार, अशी भीती व्यक्त होत आहे.गतवर्षी पंचगंगा नदीमधील दूषित पाण्याची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. त्याच दरम्यान कृष्णा नदीतील पाण्याची पातळीसुद्धा खालावल्यामुळे एप्रिल महिन्यातच नदीपात्रातील इंटकवेलचे व्हॉल्व्ह रिकामे पडले आणि पाणीटंचाई भासू लागली. नदीमध्ये पिण्याचे पाणी सोडावे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरात प्रयत्न केले. सुरुवातीला नगरपालिका व आमदार हाळवणकरांच्या प्रयत्नांना पाटबंधारे खात्याने दाद दिली नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हस्तक्षेप करून कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना समन्वय घडवून आणला. त्यामुळे इचलकरंजीस पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा करणाऱ्या नळ योजनेच्या जॅकवेलला पुरेसे होईल इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. यंदासुद्धा पाणीटंचाईच्या तीव्रतेवर उपाय करण्यासाठी आतापासूनच नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. ‘पंचगंगा’ प्रवाही ठेवण्याची मागणीपंचगंगा नदीतील पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे, याकरिता काळम्मावाडी नदीमध्ये असलेला अतिरिक्त पाणीसाठा नियोजनबद्धरीत्या वारंवार नदीपात्रात सोडून पंचगंगा प्रवाही ठेवली असता दूषित पाण्याची समस्या आणि त्याचबरोबर पाण्याची टंचाई भासणार नाही. याबाबत आतापासूनच नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.