शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पंचगंगा नदी पुन्हा बनतेय गटारगंगा

By admin | Updated: January 20, 2017 00:12 IST

प्रदूषण प्रश्न : उपसा बंद करावा लागणार; पाणीटंचाईची भीती; आगामी सहा महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन होण्याची गरज

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावली असून, पाण्यात मिसळणारे सांडपाणी आणि कचरा यामुळे पाण्यास दुर्गंधी येऊ लागली आहे. दरवर्षीप्रमाणे नदीतील पाणी प्रदूषित होऊन नगरपालिकेस पुन्हा पाण्याचा उपसा बंद करावा लागणार आहे. आगामी सहा महिने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.दरवर्षी पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावते. त्याचबरोबर ग्रामीण परिसराबरोबर इचलकरंजीतील यशोदा नाला व काळा ओढा यातून सांडपाणी नदीपात्रात येते. त्याचबरोबर नागरिकांनी नदीच्या पाण्यात टाकलेले निर्माल्य, कचरा, आदी कुजल्याने नदीतील पाणी काळे पडते व त्याला दुर्गंधी येते. यंदाही येथील पंचगंगा नदीत तेच घडते आहे. त्यातच नागरिकांनी धुतलेली जनावरे व कपडे धुण्याची भर पडत आहे.अशा पार्श्वभूमीवर राधानगरी किंवा काळम्मावाडी धरणातून सोडलेल्या पाण्याबरोबर कोल्हापूर व ग्रामीण परिसरातील सांडपाणी वाहत येते. त्याचा परिणाम म्हणून येथील नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. असे पाणी पालिकेच्या शुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले तरी त्याचा काळसर रंग व दुर्गंधी कमी होत नाही. अखेर नगरपालिकेला पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा बंद करावा लागतो आणि कृष्णा नदीतील पाणी उपशावरच अवलंबून राहावे लागते. याचा परिणाम म्हणून सध्या तीन दिवसांतून एकवेळ मिळणारे पाणी पाच दिवसांतून एक वेळ मिळते. एकूणच शहरवासीयांना पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार, अशी भीती व्यक्त होत आहे.गतवर्षी पंचगंगा नदीमधील दूषित पाण्याची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. त्याच दरम्यान कृष्णा नदीतील पाण्याची पातळीसुद्धा खालावल्यामुळे एप्रिल महिन्यातच नदीपात्रातील इंटकवेलचे व्हॉल्व्ह रिकामे पडले आणि पाणीटंचाई भासू लागली. नदीमध्ये पिण्याचे पाणी सोडावे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरात प्रयत्न केले. सुरुवातीला नगरपालिका व आमदार हाळवणकरांच्या प्रयत्नांना पाटबंधारे खात्याने दाद दिली नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हस्तक्षेप करून कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना समन्वय घडवून आणला. त्यामुळे इचलकरंजीस पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा करणाऱ्या नळ योजनेच्या जॅकवेलला पुरेसे होईल इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. यंदासुद्धा पाणीटंचाईच्या तीव्रतेवर उपाय करण्यासाठी आतापासूनच नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. ‘पंचगंगा’ प्रवाही ठेवण्याची मागणीपंचगंगा नदीतील पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे, याकरिता काळम्मावाडी नदीमध्ये असलेला अतिरिक्त पाणीसाठा नियोजनबद्धरीत्या वारंवार नदीपात्रात सोडून पंचगंगा प्रवाही ठेवली असता दूषित पाण्याची समस्या आणि त्याचबरोबर पाण्याची टंचाई भासणार नाही. याबाबत आतापासूनच नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.