शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जनता दरबार भरवायला मी सरदार नव्हं, मंत्री गोरेंची अप्रत्यक्ष पालकमंत्री देसाई यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:33 IST

'कदाचित भाजपची यादी संजय राऊत यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल'

सातारा : मी जनता दरबार भरवत नाही. कारण दरबार हा सरदाराचा असतो. मी जनतेचा सेवक आहे. त्यामुळे माझ्याकडे मोठ्या संख्येने लोक कामासाठी येतात, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. तर वयाच्या हिशोबाने सर्व अधिकार त्यांना बहाल केले आहेत. त्यांना त्रास व्हायला नको, असेही मंत्री गोरे यांनी रामराजे यांच्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले.सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजपाच्या आठ मंत्र्यांची विकेट जाणार असून त्यात गोरे यांचे नाव असल्याचे भाकीत उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. या अनुषंगाने मंत्री गोरे म्हणाले, राऊत यांच्या भाकितासंदर्भात मी कसा काय बोलू शकतो? कदाचित भाजपची यादी संजय राऊत यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल!जिल्हा परिषद शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची कागदपत्रे सादर केल्याच्या अनुषंगाने गोरे म्हणाले, संवर्ग १ मध्ये समावेश आणि बदलीपासून संरक्षण यासाठी काही जणांनी बनावट दिव्यांगत्व, आजारांचे दाखले देण्याचा प्रयत्न झाला. काहींनी तर कागदोपत्री घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले. लाभासाठी चुकीचे दाखले मिळवणारे दाखले आहेत. दाखले घेणारे आणि देणारे दोघेही दोषी आहेत. याप्रकरणी योग्य रीतीने कारवाई सुरू असल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे कौतुक केले.स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेचा निर्णयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक परिस्थितीवर अवलंबून राहतात. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला, तर अंमलबजावणीची जबाबदारी आमची आहे, तरीही वरिष्ठांची आणि आमची इच्छा असूनही काही ठिकाणी एकत्र लढता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून वेगळे निर्णय घेतले जातील, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

त्याबाबत माहिती नाही..

  • वाळवा येथील जिल्ह्यातील युवा ठेकेदाराने आत्महत्या केल्याबाबत सविस्तर माहिती घेऊन अधिक भाष्य करता येईल.
  • शेखर गोरे यांना महामंडळावर पद देण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याबाबत काहीही माहिती नाही.
  • राज्यात दीड ३० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
  • सोलापूरची जबाबदारी असली तरी जन्मभूमी-कर्मभूमी साताराकडे दुर्लक्ष होणार नाही.