शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

Satara: जनता दरबार भरवायला मी सरदार नव्हं, मंत्री गोरेंची अप्रत्यक्ष पालकमंत्री देसाई यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:33 IST

'कदाचित भाजपची यादी संजय राऊत यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल'

सातारा : मी जनता दरबार भरवत नाही. कारण दरबार हा सरदाराचा असतो. मी जनतेचा सेवक आहे. त्यामुळे माझ्याकडे मोठ्या संख्येने लोक कामासाठी येतात, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. तर वयाच्या हिशोबाने सर्व अधिकार त्यांना बहाल केले आहेत. त्यांना त्रास व्हायला नको, असेही मंत्री गोरे यांनी रामराजे यांच्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले.सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजपाच्या आठ मंत्र्यांची विकेट जाणार असून त्यात गोरे यांचे नाव असल्याचे भाकीत उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. या अनुषंगाने मंत्री गोरे म्हणाले, राऊत यांच्या भाकितासंदर्भात मी कसा काय बोलू शकतो? कदाचित भाजपची यादी संजय राऊत यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल!जिल्हा परिषद शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची कागदपत्रे सादर केल्याच्या अनुषंगाने गोरे म्हणाले, संवर्ग १ मध्ये समावेश आणि बदलीपासून संरक्षण यासाठी काही जणांनी बनावट दिव्यांगत्व, आजारांचे दाखले देण्याचा प्रयत्न झाला. काहींनी तर कागदोपत्री घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले. लाभासाठी चुकीचे दाखले मिळवणारे दाखले आहेत. दाखले घेणारे आणि देणारे दोघेही दोषी आहेत. याप्रकरणी योग्य रीतीने कारवाई सुरू असल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे कौतुक केले.स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेचा निर्णयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक परिस्थितीवर अवलंबून राहतात. पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला, तर अंमलबजावणीची जबाबदारी आमची आहे, तरीही वरिष्ठांची आणि आमची इच्छा असूनही काही ठिकाणी एकत्र लढता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून वेगळे निर्णय घेतले जातील, असे गोरे यांनी स्पष्ट केले.

त्याबाबत माहिती नाही..

  • वाळवा येथील जिल्ह्यातील युवा ठेकेदाराने आत्महत्या केल्याबाबत सविस्तर माहिती घेऊन अधिक भाष्य करता येईल.
  • शेखर गोरे यांना महामंडळावर पद देण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याबाबत काहीही माहिती नाही.
  • राज्यात दीड ३० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
  • सोलापूरची जबाबदारी असली तरी जन्मभूमी-कर्मभूमी साताराकडे दुर्लक्ष होणार नाही.