शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील पाणीसाठ्याची शंभरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण व परिसरात मागील आठवड्यापासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे तीन दिवसात ...

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण व परिसरात मागील आठवड्यापासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे तीन दिवसात धरणात साडेचार टीएमसीने पाणीसाठा वाढला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ९९.६३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजूनही सवापाच टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, तर यंदा धरण भरण्यास उशीर लागणार आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस पडला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत बनले होते. रस्ते वाहून गेले होते, तसेच जमिनी तुटल्या होत्या. हा पाऊस लोकांवर काळ बनून आला होता. अवघ्या तीन दिवसात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस पडला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली. कोयना धरणात २४ तासात १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढलेले. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत. तसेच पूर्वेकडे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना ? अशी भीती व्यक्त होत होती. पण, गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्व भागातही चांगला पाऊस होत आहे. एक महिन्यानंतर प्रथमच चांगला पाऊस होत असल्याने पिकांना फायदा झाला आहे, तर पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, वाई, जावळी तालुक्यांतही पावसाची हजेरी आहे. यामुळे पिकांना फायदा झाला. त्याचबरोबर माण, खटाव तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यांत पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

चौकट :

महाबळेश्वरला ४५ मिलिमीटर पाऊस...

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे ४२ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ३८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच नवजा येथे २७ आणि आतापर्यंत ५१४५ व महाबळेश्वरला ४५, तर यावर्षी आतापर्यंत ५१४६ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २९६२८ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक स्थिर आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे.

............................................................