शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाची मोठी मजल; कोयना अर्धे भरले, उरमोडी धरणातून विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 19:22 IST

धरणक्षेत्रात १४६४ मिलीमीटर पर्जन्यमान 

सातारा : जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली असून आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ४६४ तर महाबळेश्वरला १ हजार ३७६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातीलपाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५१.२० टीएमसी साठा झाला आहे. धरण जवळपास अर्धे भरले आहे. तर आता उरमोडी धरणाच्या वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात येत आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला. मागील १५ दिवसांपासून पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधारसारखा पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. तसेच या पावसामुळेच ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. विशेष करुन कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे. यामुळे जून संपतानाच पश्चिमेकडील अनेक मोठी धरणे अर्ध्यावर भरली आहेत. पावसाळ्याचे अजून तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात मोठे पाणी प्रकल्प भरुन वाहू शकतात असा अंदाज आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे ६९ आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ४६४, महाबळेश्वरला १ हजार ३७६ आणि नवजाला १ हजार २६३ मिलिमीटर पाऊस पडला. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवकही टिकून आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात २१ हजार २८१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ५१.२० टीएमसी पाणीसाठा झाला होता. ४८.६५ टक्के हा साठा आहे.

उरमोडी नदीकाठी सतर्कतेचा इशारा..सातारा तालुक्यात कण्हेर आणि उरमोडी धरण आहे. कण्हेर धरण १०.१० टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. धरणक्षेत्रात सध्या ६.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरणातून ७४० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच आता उरमोडी धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू झाला आहे. ९.९६ टीएमसी धरणाची क्षमता आहे.

सोमवारी सकाळी धरणात ७.१४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. जवळपास ७२ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळपासून धरणाच्या वक्र दरवाजातून दीड हजार क्यूसेक पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर पूर्वी जलविद्युत प्रकल्पातून ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. यामुळे आता उरमोडीतून २ हजार क्यूसेक विसर्ग होणार आहे. यामुळे उरमोडी नदीपात्राजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.