शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाची मोठी मजल; कोयना अर्धे भरले, उरमोडी धरणातून विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 19:22 IST

धरणक्षेत्रात १४६४ मिलीमीटर पर्जन्यमान 

सातारा : जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली असून आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ४६४ तर महाबळेश्वरला १ हजार ३७६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातीलपाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५१.२० टीएमसी साठा झाला आहे. धरण जवळपास अर्धे भरले आहे. तर आता उरमोडी धरणाच्या वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात येत आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला. मागील १५ दिवसांपासून पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधारसारखा पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. तसेच या पावसामुळेच ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. विशेष करुन कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे. यामुळे जून संपतानाच पश्चिमेकडील अनेक मोठी धरणे अर्ध्यावर भरली आहेत. पावसाळ्याचे अजून तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात मोठे पाणी प्रकल्प भरुन वाहू शकतात असा अंदाज आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे ६९ आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ४६४, महाबळेश्वरला १ हजार ३७६ आणि नवजाला १ हजार २६३ मिलिमीटर पाऊस पडला. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवकही टिकून आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात २१ हजार २८१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ५१.२० टीएमसी पाणीसाठा झाला होता. ४८.६५ टक्के हा साठा आहे.

उरमोडी नदीकाठी सतर्कतेचा इशारा..सातारा तालुक्यात कण्हेर आणि उरमोडी धरण आहे. कण्हेर धरण १०.१० टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. धरणक्षेत्रात सध्या ६.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धरणातून ७४० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच आता उरमोडी धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू झाला आहे. ९.९६ टीएमसी धरणाची क्षमता आहे.

सोमवारी सकाळी धरणात ७.१४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. जवळपास ७२ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळपासून धरणाच्या वक्र दरवाजातून दीड हजार क्यूसेक पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर पूर्वी जलविद्युत प्रकल्पातून ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. यामुळे आता उरमोडीतून २ हजार क्यूसेक विसर्ग होणार आहे. यामुळे उरमोडी नदीपात्राजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.