शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातही जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात दोन वर्षांपासून पडत असणारा समाधानकारक पाऊस आणि जलसंधारणाची कामे यामुळे पाणीपातळी टिकूून राहत आहे. याचाच परिणाम ...

सातारा : जिल्ह्यात दोन वर्षांपासून पडत असणारा समाधानकारक पाऊस आणि जलसंधारणाची कामे यामुळे पाणीपातळी टिकूून राहत आहे. याचाच परिणाम म्हणजे उन्हाळ्याही सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत वाढ दिसून आली. विशेष म्हणजे, माण व खटावसारख्या दुष्काळी तालुक्यात स्थिती अधिक चांगली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर या महिन्यात भूजल सर्वेक्षण करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील १०६ विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या वर्षीही मार्च महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळी मोजण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात एकूण निरीक्षण विहिरींची संख्या १०६ आहे. यामध्ये सर्वाधिक विहिरी या खटाव तालुक्यात १७ तर माणमध्ये १६ आणि कऱ्हाडला १५ आहेत. त्याचबरोबर, फलटण तालुक्यात १२, सातारा व पाटण तालुका प्रत्येकी १०, कोरेगाव ९, वाई ८, खंडाळा तालुका ५, महाबळेश्वर ३ आणि जावळी तालुक्यात १ निरीक्षण विहीर आहे. येथील भूजल पातळीची वाढ पाहता मार्च महिन्यात जावळी तालुक्यात २.७० मीटरवर भूजल पातळी आढळून आली. कऱ्हाडला ३.९५ मीटर, खंडाळा ४ मीटर, खटावला ६.१६ तर कोरेगाव तालुक्यात ५.६७ मीटरवर भूजल पातळी होती, तसेच माणमध्ये ५.८०, महाबळेश्वर १३.४०, पाटण ४.२५, फलटण ५.८८, सातारा ४.३४ आणि वाई तालुक्यात ६.८९ मीटरवर दिसून आली.

मागील ५ वर्षांच्या तुलनेत जावळी तालुक्यात ०.३६ मीटरने भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले, तर कऱ्हाडला ०.९९, खंडाळा १.४६, कोरेगाव १.२२, महाबळेश्वर ०.९४, पाटण तालुक्यात ०.५५, फलटण १.०३, सातारा ०.६६ आणि वाई तालुक्यात ०.८९ मीटरची वाढ नोंदली. विशेष म्हणजे, माण आणि खटाव या तालुक्यात पातळी चांगलीच वाढली आहे. खटावला २.३५ तर माणमध्ये २.३६ मीटरची वाढ आहे. जिल्ह्यात ही सर्वाधिक भूजल पातळी वाढ आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षे चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर पावसाचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत राहिला याचा हा परिणाम आहे. त्याचबरोबर, माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात वॉटर कप व शासनाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पाणी अडून राहून मुरत आहे. याचा परिणाम म्हणजे दुष्काळी तालुक्यात सर्वात अधिक पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

चौकट :

९४ विहिरींत वाढ...

जिल्ह्यात १०६ निरीक्षण विहिरी आहेत. मार्चमध्ये सर्वेक्षण केल्यावर ९४ विहिरींमध्ये वाढ तर १२ ठिकाणी घट आढळून आली. गेल्या वर्षी १४ विहिरीत घट होती. यंदा चांगली स्थिती आहे. तर खंडाळा तालुक्यातील १, कोरेगाव २, पाटण ४, वाई १ आणि सातारा आणि फलटण या तालुक्यातील प्रत्येकी २ अशा या १२ विहिरी आहेत, तर इतर तालुक्यातील सर्व निरीक्षण विहिरींमध्ये वाढ दिसून आली आहे.

......................................................................