शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

सीतामाई घाट रस्त्याला हिरवा कंदील

By admin | Updated: August 9, 2015 21:07 IST

रणजितसिंह नाईक-निंबाळकर : तीन तालुक्यांतील दळणवळणात येणार गतिमानता

फलटण : ‘प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळालेल्या फलटण ते सीतामाई डोंगर घाटरस्त्याला अखेर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे फलटण-माण-खटाव तालुक्यांत अधिक दळणवळण वाढून हे तालुके आणखी जवळ येणार आहेत,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘सीतामाई डोंगराला ऐतिहासिक परंपरा व वारसा आहे. माता सीतामार्इंनी येथे बराचकाळ वास्तव्य केले होते. फलटण तालुक्यातून सीतामाई डोंगर जवळ असूनही रस्ता नसल्याने त्याला माण तालुक्यातून किंवा खटाव तालुक्यातून वळसा घालून जावे लागत असे. यात वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. रोजगार हमी योजनेतून घाट रस्त्याचे काही काम झाले होते. मात्र रस्ता नव्हता. रोजगार हमीतून हा रस्ता वगळून या रस्त्याचा प्लॅन माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी करून घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हिंदुराव निंबाळकर यांनी फलटण, उपळवे, सीतामाई घाटरस्ता याला जिल्हामार्ग म्हणून मंजुरी मिळविली. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.’जिल्हामार्ग म्हणून मंजुरी देताना राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७ कोटी ५४ लाखांची तरतूद करताना हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. फलटण-कुरवली-दालवडी-उपळवे-वेळोशी- कुळकुजाई असा जिल्हामार्ग मंजूर झाला असताना सीतामाई डोंगर व घाटरस्ता वनविभागाच्या ताब्यात असल्याने अडचणी येत होत्या. राज्यशासन पर्यायी जागा देण्यासाठी तयार होते. मात्र, केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागातून परवानगी मिळणे गरजेचे होते. त्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दोन वर्षे सातत्याने दिल्ली दरबारी प्रयत्न केल्यानंतर केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे.हा रस्ता होणार असल्याने फलटण-माण-खटाव हे तालुके आणखी जवळ येणार आहेत. दळणवळण वाढण्याबरोबरच बाजारपेठाही जवळ येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात होणार आहे, असेही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकात स्पष्ट केले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दुष्काळी पट्ट्यातून जाणाऱ्या या रस्त्याचे काम करण्याचा आम्ही शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे. फलटण ते वेळोशी चकाचक व अधिक रुंद असा रस्ता होणार आहे. वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर