शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत

By दीपक देशमुख | Updated: July 31, 2025 14:00 IST

तारळी नदीवर २० वर्षांपासून नाही पुलाचा पत्ता : गावात रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची वानवा

दीपक देशमुखसातारा : सातारा तालुक्याच्या टोकावरील जगमीन गावातून तारळी नदी वाहते. नदीवर आजतागायत पूल बांधलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी नाइलाजाने उपाय शोधला. त्यानुसार पंधरा-वीस वर्षांपासून वीतभर खांबावरून ग्रामस्थ व शाळकरी मुले धोकादायकरीत्या नदी पार करताहेत. सातारा जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री व चार कॅबिनेट मंत्री असतानाही जगमीनचे ग्रामस्थ धोकादायक जीणं जगत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’च्या ग्राऊंड रिपोर्टमधून पुढे आले.जगमीन हे डोंगर पठारावर वसलेलं साडेतीनशे लोकवस्तीचं गाव. निसर्गाने भरभरून दान दिलं, असलं तरी डोंगराळ भागाचं खडतर जीणंदेखील येथील लोकांच्या नशिबी आहे, हे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाचा हात गावात पोहोचत नाही. गावांमध्ये वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी सुविधांचा थांगपत्ता नाही. सततच्या पावसामुळे शेतीही करता येत नाही.त्यामुळे भूमिपुत्र पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या शहरात राहत आहेत. त्यांच्या घरातील महिला, मुले, वृद्ध गावातच राहत आहेत. मुख्य रस्त्यांपासून दूर गाव असल्यामुळे साधी काडीपेटी घ्यायची असेल तरी आठ-दहा किलोमीटर चाळकेवाडीत जावे लागते. त्यामुळेच प्रशासनाच्या दृष्टीने या दुर्गम गावातील नदीवर पूल बनण्याची मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. त्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मालदेव येथेही पुलाची आवश्यकता..सातारा-ठोसेघर मार्गावर उजवीकडे मालदेव व जगमीनकडे जाण्यासाठी साधा रस्ता आहे. मालदेव येथे ओढ्यानजीक रस्ता पूर्ण उखडला आहे. या ओढ्यावरून पावसाळ्यात पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथे पूल उभारण्याची आवश्यकता आहे.

तारळी नदी ओलांडून उपचार..जगमीन गावातून तारळी नदी वाहत गेल्यामुळे अलीकडचे आणि पलीकडचे जगमीन अशा दोन वस्त्या झाल्या आहेत. या वस्त्या चाळकेवाडी ग्रामपंचायतीत येत असल्याने तिथेच आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणाला उपचाराची गरज भासली तर आठ किलोमीटरचा हेलपाटा नक्की. त्यातच नदी पलीकडील जगमीनचे रहिवासी असले तर लोखंडी खांबावरून रात्रीत नदी पार करण्याचे धाडस करावे लागते. 

शाळा अलीकडे, अंगणवाडी पलीकडेगावात जिल्हा परिषद शाळा नदीच्या अलीकडे आहे तर पलीकडील बाजूस अंगणवाडी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा पुलावरून चालतानाच्या व्हायरल व्हिडिओवरून वातावरण तापले आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषदेच्या शाळेतच अंगणवाडीच्या मुलांना बसविल्याचे दिसून आले. तथापि, ग्रामस्थांना नदी पार करण्याचा हाच काय तो खुश्कीचा; पण धोकादायक मार्ग आहे.

तारळी नदीवरील पुलासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुलाला मंजुरी दिली होती. परंतु नवीन सरकार आल्यानंतर मंजुरी रद्द झाली. तरीही पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून निवेदन दिले आहे. जिल्हा नियोजन आराखड्यात या कामाचा समावेश केल्याने पूल लवकर होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. - जगन्नाथ माने, सरपंच, जगमीन 

जगमीन गावातील दोन्हीकडच्या लाेकांना येण्या-जाण्यासाठी याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट असते. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहिल्यानंतर पूर्वी एकदा हा लोखंडी खांब वाहून जाण्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा दुर्घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार आहे का? - कोंडिबा डोईफोडे, ग्रामस्थ, जगमीन