शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत

By दीपक देशमुख | Updated: July 31, 2025 14:00 IST

तारळी नदीवर २० वर्षांपासून नाही पुलाचा पत्ता : गावात रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची वानवा

दीपक देशमुखसातारा : सातारा तालुक्याच्या टोकावरील जगमीन गावातून तारळी नदी वाहते. नदीवर आजतागायत पूल बांधलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी नाइलाजाने उपाय शोधला. त्यानुसार पंधरा-वीस वर्षांपासून वीतभर खांबावरून ग्रामस्थ व शाळकरी मुले धोकादायकरीत्या नदी पार करताहेत. सातारा जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री व चार कॅबिनेट मंत्री असतानाही जगमीनचे ग्रामस्थ धोकादायक जीणं जगत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’च्या ग्राऊंड रिपोर्टमधून पुढे आले.जगमीन हे डोंगर पठारावर वसलेलं साडेतीनशे लोकवस्तीचं गाव. निसर्गाने भरभरून दान दिलं, असलं तरी डोंगराळ भागाचं खडतर जीणंदेखील येथील लोकांच्या नशिबी आहे, हे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाचा हात गावात पोहोचत नाही. गावांमध्ये वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी सुविधांचा थांगपत्ता नाही. सततच्या पावसामुळे शेतीही करता येत नाही.त्यामुळे भूमिपुत्र पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या शहरात राहत आहेत. त्यांच्या घरातील महिला, मुले, वृद्ध गावातच राहत आहेत. मुख्य रस्त्यांपासून दूर गाव असल्यामुळे साधी काडीपेटी घ्यायची असेल तरी आठ-दहा किलोमीटर चाळकेवाडीत जावे लागते. त्यामुळेच प्रशासनाच्या दृष्टीने या दुर्गम गावातील नदीवर पूल बनण्याची मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. त्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मालदेव येथेही पुलाची आवश्यकता..सातारा-ठोसेघर मार्गावर उजवीकडे मालदेव व जगमीनकडे जाण्यासाठी साधा रस्ता आहे. मालदेव येथे ओढ्यानजीक रस्ता पूर्ण उखडला आहे. या ओढ्यावरून पावसाळ्यात पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथे पूल उभारण्याची आवश्यकता आहे.

तारळी नदी ओलांडून उपचार..जगमीन गावातून तारळी नदी वाहत गेल्यामुळे अलीकडचे आणि पलीकडचे जगमीन अशा दोन वस्त्या झाल्या आहेत. या वस्त्या चाळकेवाडी ग्रामपंचायतीत येत असल्याने तिथेच आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणाला उपचाराची गरज भासली तर आठ किलोमीटरचा हेलपाटा नक्की. त्यातच नदी पलीकडील जगमीनचे रहिवासी असले तर लोखंडी खांबावरून रात्रीत नदी पार करण्याचे धाडस करावे लागते. 

शाळा अलीकडे, अंगणवाडी पलीकडेगावात जिल्हा परिषद शाळा नदीच्या अलीकडे आहे तर पलीकडील बाजूस अंगणवाडी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा पुलावरून चालतानाच्या व्हायरल व्हिडिओवरून वातावरण तापले आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषदेच्या शाळेतच अंगणवाडीच्या मुलांना बसविल्याचे दिसून आले. तथापि, ग्रामस्थांना नदी पार करण्याचा हाच काय तो खुश्कीचा; पण धोकादायक मार्ग आहे.

तारळी नदीवरील पुलासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुलाला मंजुरी दिली होती. परंतु नवीन सरकार आल्यानंतर मंजुरी रद्द झाली. तरीही पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून निवेदन दिले आहे. जिल्हा नियोजन आराखड्यात या कामाचा समावेश केल्याने पूल लवकर होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. - जगन्नाथ माने, सरपंच, जगमीन 

जगमीन गावातील दोन्हीकडच्या लाेकांना येण्या-जाण्यासाठी याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट असते. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहिल्यानंतर पूर्वी एकदा हा लोखंडी खांब वाहून जाण्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा दुर्घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार आहे का? - कोंडिबा डोईफोडे, ग्रामस्थ, जगमीन