शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

आधी सुईचे चटके.. .. मग अंगाला हळद ! नवरदेवाची परंपरा: जबाबदारीची जाणीव करून देणारा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:46 PM

सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा

भोलेनाथ केवटे ।सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आजही पाळल्या जातात. साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या एका विवाहसोळ्यात नवरदेवाच्या हातावर आधी सुईचे चटके मग हळद लावण्यात येते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आजही सुरू आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण टप्पा असणारा हा क्षण आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. तसेच काहीजण आपली जुनी परंपरा आहे तशीच टिकवून ठेवतात तर दुसरीकडे आता बदलत्या काळानुरूप अशी काही मंडळीही दिसत आहेत.

सातारा जिल्ह्यात असेही काही समाजबांधव आहेत जे आपली जुनी परंपरा चालू ठेवत आहेत. अशाच एका समाजात लग्न समारंभात नवरदेवाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी त्याच्या हाताला सुईने चटके देण्याची परंपरा आजही टिकून आहे.त्यांचं असं म्हणणं आहे की, मुलगा आतापर्यंत कुमार वयात होता. आता तो प्रौढवयात आला आहे. त्याला जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे, याची त्याला आठवण करून देण्यासाठी लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला चटके हाताला देतात.

नवरदेवासाठी गूळ आणि चपातीचे मिश्रण करून त्याचे पाच ते सात गोळे तयार केले जातात. घरी देवाची पूजा केली जाते. तसेच ज्वारीच्या कांडकीमध्ये एक सुई ठेवली जाते. दिव्यात ती सुई गरम करून लालबुंद केली जाते आणि त्याचे सात चटके नवरदेवाच्या हाताला सर्वांच्या साक्षीने दिले जातात आणि चटका दिल्यावर त्रास होऊ नये म्हणून त्याला गुळाचा आणि चपातीचे मिश्रण केलेला एकेक गोळा खाण्यासाठी देतात.राग निवळण्यासाठी चपाती अन् गूळनवरदेवाला गरम सुईचे चटके देताना त्याला राग येतो, त्यामुळे त्याला राग येऊ नये आणि त्याचा निवळण्यासाठी त्याला चपाती व गूळ खाण्यासाठी देतात. तात्पुरता राग शांत झाला तरी ही आठवण कायमस्वरुपी त्याच्या स्मरणात राहील.नवरदेवाच्या लहान भावालाही चटकेनवरदेवाला सुई गरम करून चटके देताना त्याला लहान भाऊ असेल तर त्यालासुद्धा हे पाच ते सात गरम सुईचे चटके दिले जातात. त्याच्या लग्नावेळी हे चटके नाही दिले तरी चालतात.या गरम सुईचे चटके फक्त नवरदेवालाच आणि त्याला लहान भाऊ असेल तर त्याला देण्यात येतात. नवरीला अशाप्रकारचे चटके देत नाहीत. 

आमची ही परंपरा फार पूर्वीपासून चालून आलेली आहे. आजही आम्ही ती चालूच ठेवली आहे. नवरदेवाला आता जबाबदारीची जाणीव करून चटके देण्याची ही प्रथा चालू आहे. काळानुरूप बदलायला हवे. मात्र, आपल्या जुन्या चालत आलेल्या परंपराही जतन केल्या पाहिजेत.-संजय राठोड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न