शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरसह परिसरात शेतकऱ्यांची कामे खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी ...

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी साचल्याने भाजीपाल्यासह भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना अतिपाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून भाजीपाला पिकांचे जतन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा पद्धतीने शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी रोजच सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील बहुतांशी शेतांत पाणी साचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीसह टोकणीची कामे खोळंबली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी टोकणीसह पेरणीही केली. मात्र सततच्या पावसाने दलदल निर्माण झाल्यामुळे अंतर्गत मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. महामार्ग पश्चिम बाजू व नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. या भागात पेरलेले भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्याच पद्धतीने मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगाव परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय व भेंडी, गवारीसारख्या शेंगवर्गीय भाज्यांची पिके घेतली जातात. सततची रिपरिप सुरू असल्यामुळे पालेभाज्याची पिके रानातच कुजत आहेत. तर अनेक पर्यायकरून जतन केलेल्या पिकांवर ढगाळ वातावरण व धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गेली आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रानात पाणीच पाणी झाल्याने या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चौकट (फोटो आहे.)

पाण्यामुळे उसाची वाढ खुंटली...

नदीकाठचा परिसर म्हटलं की ऊसशेती आलीच. त्यामुळे मलकापूरसह आसपासच्या गावांत उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. अतिपावसामुळे उसाच्या रानात पाणी साचून अनेक ठिकाणी ऊसपीक भुईसपाट झाले आहे. ऊसतोडीनंतर काही शेतकऱ्यांनी खोडवा जतन केला, अशा शेतात गुडघाभर पाणी असल्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. तर काही शेतकऱ्यांनी लागणीसाठी तयार केलेल्या रानात दलदल असल्यामुळे लागणीची कामेही खोळंबली आहेत.

२७मलकापूर

नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

270621\img_20210627_143638.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

महामार्ग पश्चिम बाजू , नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगांव च्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीचपाणी साचल्यामुळे पाण्या-पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया- माणिक डोंगरे)