शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून जुल्मी फर्मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:45 IST

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी नदी किंवा कॅनॉलचे पाणी शेतीसाठी वापरत नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने पाणीपट्टी आकारणीची नोटीस पाठवून पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना आकारणी रद्द करावयाची आहे, त्यांनी सदर जलसंपदा विभागात जाऊन योग्य पुरावा दाखवून ती रद्द करुन घेण्यासाठी जलसंपदा कार्यालयात खेटे घालण्याचे जुल्मी फर्मान काढले आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून जुल्मी फर्मान !पाणीपट्टीची सरसकट नोटीस : ड्रोन सर्व्हेस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

सातारा : सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी नदी किंवा कॅनॉलचे पाणी शेतीसाठी वापरत नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने पाणीपट्टी आकारणीची नोटीस पाठवून पाणीपट्टी भरण्याचे आदेश दिले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना आकारणी रद्द करावयाची आहे, त्यांनी सदर जलसंपदा विभागात जाऊन योग्य पुरावा दाखवून ती रद्द करुन घेण्यासाठी जलसंपदा कार्यालयात खेटे घालण्याचे जुल्मी फर्मान काढले आहे.स्वमालकीची विहीर बोअरिंग असताना शेतकऱ्यांना पाणीपट्टी कशी आकारली जाते, असा सवाल करुन पाणीपट्टी रद्द करा, नाहीतर तीव्र आंदोलन करु, असा इशारा निवेदनाद्वारे स्वाभिमानीचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे.निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाच्या २00९ च्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्यांची विहीर जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्रात येते; परंतु तो शेतकरी जर प्रवाही पद्धतीने किंवा उचलून ते पाणी शेतीला देत नसेल तर त्याला पाणीपट्टी आकारता येणार नाही, हे स्पष्ट केले आहे.

असे असताना ड्रोन सर्व्हे केल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांचे क्षेत्र हे लाभक्षेत्रात दर्शवले गेले आहे. वास्तविक, लाभक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर लादण्यात आलेली पाणीपट्टी ही काही अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन केली आहे.

प्रत्यक्षात ड्रोन सर्व्हे टेंडरमध्ये पाण्याच्या स्त्रोताची अचूक माहिती घेऊन त्यानुसार पाणीपट्टी आकारणी करावयाची आहे. ड्रोन टेंडरधारकाने प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन लाभक्षेत्र ठरवणे गरजेचे होते; परंतु असे न करता ड्रोनद्वारे आलेल्या फोटोवरुन लाभक्षेत्र ठरवले गेले आहे. टेंडरधारकाला त्रास नको म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करुन शेतकऱ्यांना त्रास देणे सुरु केले आहे.निवेदन देताना स्वाभिमानीचे अनिल घराळ, शिवाजी पाटील, मनोज जाधव, योगेश झाम्बरे, प्रसाद धोकटे, विकास जाधव, इतर पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.न्याय मिळाल्यानंतर पाणीपट्टी भरुया ड्रोन सर्व्हेला विरोध करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांची बदली करणे, पगार रोखणे, त्यांच्या जागेवर अनुभवशून्य कर्मचारी नेमणे व त्यांना अधिकार बहाल करणे, अशी कामे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यामुळे या ड्रोन सर्व्हे टेंडरमध्ये संशयास्पद गोष्टी घडल्याचे दिसून येत आहेत.

या टेंडरची चौकशी करुन शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत अन्यायकारक पाणीपट्टी आकारणी रद्द होत नाही, तोपर्यंत कोणताही शेतकरी व संस्था रितसर पाणीपट्टी भरणार नसल्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पSatara areaसातारा परिसर