शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात पावसाची उघडीप; कोयनेतील साठा झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, कोयना धरणातील साठ्यात घट होऊ लागली आहे, तर पूर्व भागात ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, कोयना धरणातील साठ्यात घट होऊ लागली आहे, तर पूर्व भागात काही ठिकाणी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेष करून पश्चिम भागात धुवाधार पाऊस झालेला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली होती, तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. असे असतानाच गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पश्चिमसह पूर्व भागातील खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. धरणातही पाण्याची आवक कमी होताना दिसून येत आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे पाऊस पडला नाही; पण जूनपासून कोयनानगरला ९२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आतापर्यंत ११०४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे, तर महाबळेश्वरला जूनपासून १२८७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.७९ टीएमसी पाणीसाठा होता, तर ४७५० क्युसेक वेगाने पाणी आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तरीही कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे.

दरम्यान, सातारा शहराबरोबरच परिसरात ढगाळ वातावरणाबरोबर ऊनही पडत आहे. पूर्व भागात खरीप हंगामाची पेरणी अडखळत सुरू आहे. पेरणी पूर्ण होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.