शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तालुक्यातील पुलांचे अस्तित्वच गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

रामापूर : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरील पुलांना बसल्याने नदी, ओढ्यांवरील पुलांचे जीवनमान धोक्यात आले ...

रामापूर : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरील पुलांना बसल्याने नदी, ओढ्यांवरील पुलांचे जीवनमान धोक्यात आले आहे तर काही पूल अस्तित्वातच राहिले नसल्याने तालुक्यातील डोंगरकपारीत राहणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना दळणवळणासाठी त्रास होत आहे.

पाटण तालुक्यात अतिवृष्टीने केरा विभागातील पाटण ते चाफोली या मार्गावर मेष्टेवाडी, केरा, घाणव, चाफोलीपर्यंत अनेक पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतुकीकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विभागातील बोद्री आणि आंबवणे या गावच्या पुलांचे अस्तित्वच नष्ट झाल्यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मोरणा विभागातील गुरेघर धरणापर्यंत आणि तेथून ओटील-पाचगणीपर्यंत असणाऱ्या रस्त्यावर असणारे लहान आणि मोठे पूलच वाहून गेल्याने डोंगरपठारावर राहणाऱ्या अनेक गावांची दळवळणाची गैरसोय होत आहे. कुसरुंड ते कदमवाडी, कळकेवाडी या मार्गावर फरशीच वाहून गेल्याने दळणवळणाची गैरसोय होत आहे.

चौकट..

यापुढे पूल बांधताना अभ्यास करून बांधावा..

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यांचे नुकसान झाले आहे. हे झालेले नुकसान लवकर भरून न येणारे आहे. त्यामुळे किमान नवीन पूल बांधताना अभियंत्यांनी तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा अभ्यास करून पुलाची रचना करावी आणि पुलामध्ये पाईपच्याऐवजी उच्च प्रतीचे स्लॅब पद्धतीचे पूल बांधण्यात यावेत, अशी मागणी तालुक्यातील बाधित गावांमधील ग्रामस्थांकडून होत आहे.

२९ रामापूर

फोटो - पाटण तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरील पूल, रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. (छाया : प्रवीण पवार)