शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बैठकांसह कार्यक्रमांना बोलावले जात नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

दरम्यान, पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांचे प्रस्ताव सादर होणे गरजेचे आहे. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत असे प्रस्ताव गावातून येतच नसतील ...

दरम्यान, पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांचे प्रस्ताव सादर होणे गरजेचे आहे. मात्र, जलजीवन मिशन अंतर्गत असे प्रस्ताव गावातून येतच नसतील तर संबंधित गावांचे ग्रामसेवक काय करतायत? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामसेवकांच्या कारभारावर उपसभापती रमेश देशमुख यांनी ताशेरे ओढले.

येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्यासह सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरूवातीला पाणी पुरवठा विभागाकडून आढावा देण्यात आला. आकाईचीवाडी, भुरभुशी, वानरवाडी, जिंती, ओंड, वहागाव, खुबी, हेळगाव, वाघेश्वर, कांबीरवाडी, चिखली, खराडे, नवीन कवठे, बानुगडेवाडी, गोटे, वनवासमाची-खोडशी, धोंडेवाडी, वनवासमाची-सदाशिवगड, धोंडेवाडी-डिचोली पुनर्वसन, नांदलापूर, कालेटेक, सुर्ली, कामथी, संजयनगर, तासवडे, बामणवाडी, पवारवाडी-नांदगाव, गोसावेवाडी, खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, अंतवडी, कालेटेक, किवळ, वडोली भिकेश्वर, रिसवड, कोरीवळे व डफळवाडी या गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई भासू शकते. त्याचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

उपसभापती रमेश देशमुख यांनी गावातून जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावच येत नसतील तर ग्रामसेवक काय करताहेत? अशी विचारणा केली. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी पाणी पुरवठा विभागाने ग्रामसेवकांना माहिती देऊन प्रस्ताव तयार करुन घेतले पाहिजेत, अशा सूचना केल्या.

पंचायत समिती संदर्भातील अनेक बैठकांना आणि पंचायत समितीच्या विविध विभागांच्या कार्यक्रमांना सदस्यांना बोलवलेच जात नाही, असा आरोप सभापती प्रणव ताटे, सदस्या फरिदा इनामदार, अर्चना गायकवाड, सदस्य रमेश चव्हाण, अ‍ॅड. शरद पोळ यांनी उपस्थित केला. सभापती ताटे यांनी संबंधित बैठकांना सदस्यांना का सांगितले जात नाही अशी विचारणा करुन त्या बैठकांना किती ग्रामसेवक उपस्थित असतात? ग्रामसेवकच नसतील तर कसे आराखडे करणार असे सुनावले. सदस्या फकीर यांनीही बैठकांना, कार्यक्रमांना बोलवले जात नाही हे तीन वर्षे आम्ही सांगत आहोत, तरीही सुधारणा होत नाही, मग त्याचा उपयोग काय ? असे उद्विग्नपणे सांगितले. सदस्य चव्हाण यांनीही सुधारणा होणार नसेल तर तसे सांगा असे म्हणाले. त्यावर सभापती ताटे यांनी माफी मागून उपयोग नाही, यापुढे सुधारणा दिसली पाहिजे, असे खडसावले.

- चौकट

कऱ्हाड, मलकापुरात भरणार शेतकरी बाजार

तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी कृषी विभागाच्या नवीन योजनांची माहिती देऊन संत सावता माळी शेतकरी बाजार कऱ्हाड शहर आणि मलकापूरमध्ये भरवण्यात येणार असल्याचे सांगितले. सभेत बांधकाम, शिक्षण, लघू पाटबंधारे, ग्रामपंचायतसह अन्य विभागांचा आढावा झाला. उपसभापती देशमुख यांनी आभार मानले.

- चौकट

शेतकऱ्यांचे १३२ कोटी वीज बिल थकीत

वीज कंपनीच्या आढाव्यावेळी ३५६ शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची वीज थकबाकी १३२ कोटी आहे. त्यांना वीज बिल भरण्यामध्ये सूट देण्यात आली. त्यासाठी गावोगावी बैठका घेण्यात येत असल्याचेही सांगितले. स्ट्रीट लाईटसाठी जिल्हा नियोजनमधून पैसे मिळावे, अशी मागणी सदस्य देवराज पाटील यांनी केली.