शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

शिस्तबद्ध, सुरक्षित वाहतुकीवर राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:26 AM

वाढते अपघात हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात. - अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग

ठळक मुद्दे ‘ब्लॅक स्पॉट’वर उपाययोजना आवश्यक

संजय पाटील।क-हाड : दंडात्मक कारवाई हा वाहतुकीला शिस्त लावण्याचा एक भाग असला तरी फक्त कारवाई करून संभाव्य अपघात टाळता येणार नाहीत. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळता येतील. शिस्तबद्ध, अपघातविरहित आणि सुरक्षित वाहतुकीवर आमचा भर राहील, असे मत महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी व्यक्त केले.

प्रश्न : अपघाती क्षेत्र किती? त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?उत्तर : शेंद्रे ते पेठनाक्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग तसेच कºहाड-सांगली, कºहाड-विटा, कºहाड-कोयनानगर, कºहाड-कोकरूड, कºहाड-तासगाव हे मार्ग आमच्या अखत्यारीत येतात. या हद्दीत २६ ठिकाणे अपघाती आहेत. त्या-त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम विभागाला सुचविल्या आहेत.

प्रश्न : जोडरस्ते सुरक्षित आहेत का?उत्तर : उपमार्ग ज्याठिकाणी महामार्गाला जोडले जातात त्याठिकाणी महामार्गावर रम्बलर तसेच उपमार्गावर गतिरोधक उभारण्याची सूचना केली आहे. या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. त्याचबरोबर उपमार्गावरील अडथळे हटविण्याबाबत महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला आहे. पूर्वसूचना देणारे फलक, ब्लिंकर्स बसविण्याबाबतही मागणी करण्यात आली आहे.

प्रश्न : सुरक्षित वाहतुकीसाठी कशावर भर राहील?उत्तर : लेनकटिंग, वेगमर्यादा ओलांडणे, विनाहेल्मेट दुचाकी प्रवास, सिटबेल्ट नसणे, धोकादायक माल वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी असते. त्यामुळे अशा चालकांवर कटाक्षाने कारवाई केली जात आहे. तसेच त्यांना समजही दिली जात आहे.

महामार्गावर वाहने अडवत नाहीच!महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे कारवाईसाठी कोणतेही वाहन थांबविण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत नाही. अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार सुरक्षित ठिकाणी कारवाई केली जाते. ई-चलन पद्धतीने दंड आकारणी केली जात असल्याने वाहने अडविण्याचा प्रश्नच नाही.

कोल्हापूर नाका धोकादायक!कोल्हापूर नाक्यावरील वाढते अपघात पाहता याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. सातारा-कोल्हापूर लेनवरील एक लेन कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या वाहनांसाठी वापरात यावी, अशी आमची सूचना आहे. त्याचबरोबर याठिकाणी उड्डाण पूल झाल्यास अपघात टळतील. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. याबाबत संबंधित विभागाशी आम्ही पत्रव्यवहारही केला आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसhighwayमहामार्ग