शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आयशर टेम्पोची दिंडीतील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक, 1 वारकरी ठार 30 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 11:09 IST

दिंडी सोहळ्यातील ट्रँक्टर ट्राँलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमध्ये 1 वारकरी ठार तर 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत

मुराद पटेल सातारा - आशियाई महामार्ग 47 वरील सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीतील पुणे थांब्याजवळ आयशर टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने असलेल्या आयशर टेम्पोने कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले येथील दिंडी सोहळ्यातील ट्रँक्टर ट्राँलीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमध्ये 1 वारकरी ठार तर 30 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत 11 वारकरी किरकोळ जखमी झाले आहे. या अपघातामध्ये मायप्पा कोंडिबा माने (वय 45, रा,भादोले ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मारुती भैरवनाथ कोळी (वय 40,रा.लाहोटे ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ) हे मृत्यूशी झुंज देत आहेत. सदरील घटना रविवार दि.19 जून रोजी मध्यराञी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले, लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या श्री. भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी क्रं.1 व 7 हा दिंडी सोहळा पंढरपूर पायी वारी करणेकरीता आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळ्याकरीता आळंदी येथे ट्रँक्टर (क्रं- एमएच-10-ay-5705) ट्राँलीमधून प्रवास करीत होते. यावेळी सदरील ट्रँक्टरला दोन ट्राँल्या जोडलेल्या होत्या.यामध्ये महिलांसह 43 वारकरी ट्रँक्टर ट्राँलीमध्ये आळंदीकरीता प्रवास करीत होते. दरम्यान,ट्रँक्टर ट्राँली सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर  खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत आली असता पाठीमागून तरकारी घेऊन पुणेकडे भरधाव वेगात निघालेल्या आयशर टेम्पो (क्रं.एमएच-45-एएफ-2277) वरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या विदयुत खांबाला जोरदार धडक दिली. तसेच, महामार्गावरुन दिंडी सोहळ्याकरीता निघालेल्या ट्रँक्टर ट्राँलीलाही पाठीमागून जोरदार धडक दिली. हि धडक ऐवढी जोरदार होती की, धडकेनंतर टेम्पो महामार्गावर जोरदार पलटी होत ट्रँक्टर ट्राँलीमधील वारकरी महामार्गावर हवेत उडत गंभीर जखमी झाले तर ट्रँक्टर ट्राँलीच्या पाठीमागील ट्राँलीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यावेळी, ट्राँलीमधील लोखंडी बार मायप्पा माने व मारुती कोळी यांच्या पोटामध्ये घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, यावेळी अपघातामध्ये भादोले,लाहोटे येथील इंद्रजित पांडुरंग पाटील(वय 50), बाळासो ज्ञानू तावडे, प्रमिला वसंत पाटील(वय 55), शिवाजी दत्तू सलगर(वय 72), यशवंत सुराप्पा शिंदे (वय 67), कृष्णात उर्फ बाप्पू यादव(वय 55), शिवाजी माने(वय 70), भिकाजी सखाराम माने ,महिपती महादेव पाटील (वय 65),सचिन रामचंद्र नांगरे(वय36), शिवाजी यशवंत नांगरे(वय70), आनंदा युवराज माने(वय45), रघुनाथ भैरु माने(वय 48), शिवाजी धोंडिराम येडके(वय50), महादेव ज्ञानू पाटील(वय 65),रमेश राजाराम पाटील(वय 57), शोभा नाना माने(वय40), वसंत लखु माने (वय 60),तानाजी राजाराम तावडे(वय 47), विमल बाळासो तावडे(वय 60), कल्पना पाटील(वय50), विलास आनंदा पाटील (वय65) व इतर दोन वारकरी असे तीस वारकरी गंभीर तर अकरा वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी संबंधितांना तातडीने उपस्थित युवकांच्या व नागरिकांच्या मदतीने शिरवळ पोलीसांनी पुणे जिल्ह्यातील किकवी व सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील 108 रुग्णवाहिकेमधून व खाजगी रुग्णवाहिकेमधून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या मायप्पा माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मारुती कोळी यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

या अपघाताची माहिती मिळताच तातडीने शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, शिरवळ पोलीस स्टेशनच्या व सारोळा महामार्ग मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत मदतकार्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.यावेळी अपघातानंतर अपघातामधील वाहने बाजूला घेताना दोन्ही बाजूकडील वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती.यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनच्या व सारोळा महामार्ग मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलीस स्टेशनला सुरु होते. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरPandharpurपंढरपूरvarkariवारकरी