शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कमी खर्चात खत निर्मितीसाठी पाऊल प्रयास ; सामाजिक संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:29 IST

वडूज : कचरा हा सार्वजनिक कुंडीत किंवा कचरागाडीत टाकून प्रश्न संपत नाहीत. त्याची विल्हेवाट सरकारने अथवा नगरपंचायतीने करावी, ही ...

ठळक मुद्देवडूजकरांना ओल्या कचऱ्याबाबत मोफत मार्गदर्शन

वडूज : कचरा हा सार्वजनिक कुंडीत किंवा कचरागाडीत टाकून प्रश्न संपत नाहीत. त्याची विल्हेवाट सरकारने अथवा नगरपंचायतीने करावी, ही अपेक्षा असते. तो कचरा आपण केलेला आहे, त्याची जबाबदारी आपलीसुद्धा आहे. हेच ओळखून कचरा व्यवस्थापनाच्या या सामाजिक जबाबदारीत प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी येथील प्रयास सामाजिक संस्थेकडून घरगुती ओल्या कचरा व्यवस्थापनासाठी कमी खर्चात खत निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

कचरा हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. साधारण १.५ लाख टन कचरा भारतात रोज निर्माण होत आहे. एकट्या महाराष्ट्रात ९३ लाख टन कचरा वर्षाला तयार होतो. त्यातील ७५ लाख टन हा घरगुती स्वरुपाचा आहे. कचरा १०० टक्के वर्गी व विलगीकरण प्रक्रिया पुनर्वापरात आणणे गरजेचे आहे.

सध्या नगरपंचायतीच्या माध्यमातून वडूजमध्ये कचरा निर्मूलनासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे. महिना पाच लाख दहा हजार रुपयांप्रमाणे ठेकेदाराला पैसे मोजावे लागत आहेत. हा खर्च आटोक्यात आणायचा असेल तर या संस्थेच्या धर्तीवरचे प्रयोग अंमलात आणणे गरज आहे. हा घरगुती प्रकल्प अर्धा ते एक किलो कचºयासाठी आहे. तसेच यापेक्षा जास्त प्रमाणात ज्या ठिकाणी तयार होणाºयांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेकडून मार्गदर्शन मिळेल व जीवाणू कल्चर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.नागरिकांना आवाहन...जाळीच्या बास्केट किंवा ट्रेला हिरवे नेट आतल्या बाजूने शिवून घ्या. बास्केटच्या तळाला दाभणाने एक छिद्र पाडून घ्या.तळातल्या बाजूला सुरुवातीला थोड्या नारळाचे केसर किंवा झाडाची वाळलेली पाने अंथरूण घ्यावे.त्याच्यावर दररोज अर्धा किलो कचरा टाकून त्यावर एक चमचा जीवाणू कल्चर टाकावे. ही प्रक्रिया दररोज करावी.बास्केट हवेशीर जागी ठेवावी, साधारण ४० दिवसांनंतर खत वापरास येईल, बास्केटमधील वरचा थर बाजूला काढून तळातील बाजूचे खत काढून घ्यावे.जीवाणू कल्चर वापरल्यामुळे बास्केटमध्ये हिट तयार होऊन कचºयाचे डिहायड्रेशन होऊन कचरा आकुंचन पावतो. त्यामुळे एक बास्केट किमान ४ ते ५ महिने भरत नाही.तसेच जीवाणू कल्चर वापरामुळे या कचºयातून वास किंवा दुर्गंधी येत नाही.जीवाणू कल्चर खर्च ३० रुपये दरमहा म्हणजेच १ रुपया प्रति दिवस एवढाच आहे.साहित्य व खर्च१ जाळीची प्लास्टिक बास्केट किंवा क्रेट - २०० रुपये,१ मीटर नेट जाळीचे कापड - ३० रुपये,जीवाणू कल्चर - दरमहा ३० रुपये

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी