शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अपक्षच खाणार भाव

By admin | Updated: July 27, 2015 00:21 IST

वाईत अटीतटीचा सामना : वालेघर, किरोडे, जोरे येथे प्रशासक येण्याची शक्यता

संजीव वरे- वाई -तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ४३ गावांतील ग्रामपंचायतींसाठी ४५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असून, १३१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर तीन ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवाराने अर्ज भरला नाही. २५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. भविष्यात गावोगावी दोन तर काही ठिकाणी तीन गटांत निवडणुका होणार आहेत. दोन काँग्रेस आमने-सामने असताना अपक्ष कुणाची मते खाणार याला भलतेच महत्त्व आले आहे.गावची ग्रामपंचायत म्हणजे गावच्या विकासाचा केंद्रबिंदू. गावची एकी असली की लोकसहभागातून गावची विकासकामे, मोठमोठे प्रकल्प, शासनाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबवून गावचा सर्वांगीण विकास व गावची शांतता टिकण्यासाठी निवडणुका बिनविरोध करणारी गावे सुरुर, सटालेवाडी, आनंदपूर, व्याहळी (पुनर्वसन) वयगाव, दह्याट, बेलमाची, खानापूर, शेलारवाडी, वेरुळी, कळंबे, बोरगाव, मालतपूर, पांढरेचीवाडी, नागेवाडी, रेनावळे, जांभळी, उळुंब, खावली, कोंढवली, अनपटवाडी, दरेवाडी, नांदगणे, दसवडी, बोरीव ही आहेत. तर बावधन, बोपेगाव, पसरणी, चिखली आणि अभेपुरी या गावांत अटीतटीच्या व रंगतदार लढती होणार आहेत. अनवडी, आसरे, भोगाव, चांदक, देगाव, धोम, एकसर, कडेगाव, खोलवडी, मोहडेकरवाडी, मुंगसेवाडी, निकमवाडी, पांडेवाडी, राऊतवाडी, वेलंग, विरमाडे, वासोळे, मुगाव, आकोशी, आसले, गुळुंब, गुंडेवाडी, लोहारे, मांढरदेव, मेणवली, परखंदी, शेंदूरजणे, शिरगाव, उडतारे, वरखडवाडी, वहागाव, वाशिवली, व्याजवाडी, गाढवेवाडी, धावडी परतवडी या गावांतील उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर वालेघर, किरोडे व जोर येथे प्रशासक येण्याची शक्यता आहे. अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून, यावेळी काँग्रेस व त्यांच्यातच खरी लढत आहे. शिवसेना काही गावांत आपले प्रतिनिधी निवडून आणण्यात जोर लावते का? हेही आगामी काळात दिसून येईल. काही गावांत काँगे्रस, राष्ट्रवादीबरोबर तिसऱ्या अपक्षांच्याही लढती होऊन याचा फटका कोणाला बसतो? हेही निकालानंतर स्पष्ट होईल. आपले वरिष्ठ नेते एकमेकांत वेळप्रसंगी सलगी करताना मात्र गावोगावी एकमेकांची जिरवा जिरवीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार ठरणार, हे मात्र निश्चित.ग्रामपंचायत निवडणूक राजकारणाचे दुष्परिणामशेतातील कामे करण्यासाठी मशागती व वारंगुळे सोडून दिले जातात. त्यामुळे ज्यांच्याकडे बैल व अवजारे नसतात त्यांना खूप त्रास होतो.सत्ताधारी गटाच्या ग्रामसभांना विरोधी ग्रामस्थ न आल्याने निर्णय तडीस जात नाहीत.लोक सहभाग व लोक वर्गणी दोन गट झाल्याने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प योजना रखडतात.एकमेकांवर कुरघोडी, उणीधुणी काढण्याने गावची विकासकामे होत नाहीत.एक गाव एक गणपती, डॉल्बी बंद असे निर्णय व वेगवेगळ्या कमिट्या स्थापनेत अडसर येतो. पावसापेक्षा प्रचाराचा जोर वाढला तालुक्यात पावसाचा जोर कमी; पण प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. मधल्या काळात उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. परंतु ऐनवेळी पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे पदयात्रा, बैठका, जेवणावळी, प्रचाराचा जोर मात्र वाटला आहे. अनेक गावांत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख लढती आहेत. मात्र या पक्षातील बंडखोर व अपक्ष उमेदवार कोणाचे मतदान घेणार यावरही अनेक निकालांची गणिते फिरतील.