शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सातारकरांनो पाणी जपून वापरा, उन्हामुळे कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 4:07 PM

वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार.

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. गतवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कासचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.सध्या मागील महिन्यापासून जुना व्हॉल्व्ह ऑपरेट न करता सध्या नवीन लाईन सुरू केल्याने शेवटपर्यंतचा एकच नवीन व्हॉल्व्ह सुरू राहणार आहे. गतवर्षी मे महिन्याच्या पंधरवड्यात नऊ फूट पाणीसाठा शिल्लक होता. सद्यस्थितीत तलावात दहा फूट पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीपेक्षा एका फुटाने अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.सद्यस्थितीला तलावात केवळ दहा फूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. दोनवेळा झालेल्या अवकाळी पावसाने कास तलावाच्या पाणीपातळीत दोन ते तीन इंच वाढ झाली. परिसरात उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.दिवसेंदिवस पाणीपातळी खालावतेय...शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दिवसाला तलावातील पाणीपातळी सव्वा ते दीड इंचाने कमी होत आहे. तलावातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत असून, काही ठिकाणी पात्रातील जमिनीदेखील उघड्या पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणीपातळी खालावतच चालली आहे.

सध्या कास तलावात दहा फूट पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा एका फुटाने पाणीसाठा जरी जास्त असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. -जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानWaterपाणी