शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात धरणे गाठतायत तळ, उन्हाची झळ...

By admin | Updated: March 23, 2017 12:53 IST

नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले : पूर्व भागाला टंचाईच्या झळा; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज

आॅनलाईन लोकमतसातारा : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत. परिणामी जिल्ह्याच्या पूर्व भागाला टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश धरणे निम्म्यावर आली असून, काही धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. सद्य:स्थिती पाहता पुढील दोन महिन्यांत धरणे तळ गाठणार असून, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहेत. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम, नीरा-देवघर, भाटघर, तारळी आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. तसेच कूपनलिका, विहिरी, ओढे व तलावांमध्येही मुबलक पाणीसाठी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत. परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने माण, फलटण तालुक्यांत पाणी टॅँकर सुरू करून ग्रामस्थांना दिलासा दिला असला तरी पुढील दोन महिन्यांत पूर्व भागातील पाणीटंचाईचे चित्र अधिक भीषण होणार आहे.एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांंमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे. कोयना व उरमोडी धरण वगळता बहुतांश धरणे जवळपास निम्म्यावर आली आहेत. कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात पाणीसाठा जास्त असला तरी वीजनिर्मिती व शेतीसाठी पाण्याचा वापर पाहता पावसाळा सुरू होईपर्यंत दोन्ही बाबींसाठी पाण्याचा मेळ घालणे कोयना व्यवस्थापनापुढे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)कोयनेत ६.९५ टीएमसी पाणीसाठा अधिक१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण गेल्या वर्षी जवळपास शंभर टक्के भरले. त्यामुळे वीजनिर्मितीसह, सिंचन व शेतीपाण्याचा प्रश्न यंदा काही प्रमाणात मिटला. कोयना धरणात आजमितीस ४८.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच दिवशी ४१.१९ टीएमसी पाणी शिल्लक होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात ६.९५ टीएमसी पाणी अधिक आहे. धरणातील १३ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार आहे. तर ६ टीएमसी पाणी सांगली लघू पाटबंधारे विभागाला वीज व शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. २३ टीएमसी पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील शेतीसाठी होणार आहे.