शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

पावसामुळं गुळाला मिळेना गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:01 AM

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील गु-हाळघरांना घरघर, गूळ हंगामाची बिकट स्थिती उत्पादनात मोठी घट

स्वप्नील शिंदे ।सातारा : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात जशी खडतर सुरू आहे, त्याहीपेक्षा बिकट स्थिती गूळ हंगामाची आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील गुºहाळघरांना घरघर लागली असून, गुºहाळघरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याच्या आसपास येऊन ठेपली आहे. त्यात महापूर, अतिवृष्टीमुळे गुºहाळघरांची पडझड आणि चुलवाणासाठी आवश्यक असलेले जळण भिजले आहे. त्यात ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातून गुळाला गोडवा मिळत नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. तसेच काही गुºहाळांची पडझड झाली. या संकटातून सावरून अनेक गुºहाळ चालकांनी गुºहाळ चालू केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात दररोज पडत असलेल्या पावसामुळे गुºहाळासाठी आवश्यक असलेले साहित्य भिजून गेले.

दरवर्षी साधारण गौरी-गणपती व दसऱ्याच्या मुहूर्तावर गुºहाळ चालू होत असतात. मात्र, यंदा परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतातून ऊस बाहेर काढताच येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर गुºहाळ सुरू झाली. अनेक दिवस ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातील गोडवा गायब झाला आहे. त्यामुळे गूळ उत्पादनासाठी गुºहाळघरात दरवर्षी सरासरी एका आदणात २०० ते २५० किलो गूळ तयार होत होता. परंतु सद्य:स्थितीत एका आदणासाठी दीड टन ऊस लागतो. त्यातून १4० ते १७० किलो गूळ तयार होतो. सध्या बाजारपेठेत सरासरी प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपये दर मिळतो. प्रत्यक्षात शेतकºयाला एका आदणामागे वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे आदींसह ८००० ते ८५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे मिळणारे उत्पन्न ६००० ते ६५०० रुपयांपर्यंतच आहे. एका आदणामागे ११०० ते १२०० रुपयांचा तोटा होत आहे.

दर मिळत नसल्याने जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी पर्यंत असलेली गुºहाळघरांची संख्या ५० पर्यंत कमी झाला आहे. भविष्यात गु-हाळघरे शोधायची वेळ येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने गुºहाळांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे

साखर कारखान्याला ऊस घातला तर एफआरपीनुसार प्रतिटन २८०० ते २९०० रुपये दर मिळतो. मात्र गूळ उत्पादनातील घसरणीमुळे एक टनाला सर्व खर्च धरून फक्त १७०० ते १८०० रुपयेच मिळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी गुºहाळघरांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.- बाळासाहेब नलवडे, गूळ उत्पादकमहापूर आणि परतीचा पाऊस यामुळे अजून १० टक्के गुºहाळ सुरू झाली नाहीत. त्यामुळे बाजारात गुळाची म्हणावी अशी आवक होत नाही. मात्र, आवक होणारा गूळही दर्जेदार नाही. त्यामुळे त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे.- उत्तमराव जाधव-भाटवडीकर,आडतदार, क-हाड बाजार समितीसध्या गूळ व्यवसायातील अडचणींमुळे पुरता धोक्यात आला आहे. सुरुवातीला हंगामाच्या मुहूर्तावर सौदे काढताना दराचा जो फुगवटा तयार होतो, तो नंतरच्या काही दिवसांत कमालीचा घटतो. सरकारने साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे २९०० रुपयांच्या खाली साखर विकता येत नाही. शेतकरी गूळ उत्पादित करतो. मात्र व्यापाºयांच्या मनमानीपणावर गुळाचा दर ठरतात.- सचिन नलवडे, रयत क्रांती संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसर