शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

परिवर्तनाची प्रेरणा मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:04 IST

‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

क-हाड - ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘एफआरपी लागू करून शेतक-यांना चांगला ऊसदर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहेच. शिवाय शुक्रवारीच १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी एवढी कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशातील उत्तुंग नेतृत्व आणि ज्यांनी ख-या अर्थाने महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. 

यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले. तसेच महाराष्ट्रात राहणा-या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तनाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचं सरकार काम करीत आहे. आणि मला विश्वास आहे, ज्या सुसंस्कृत राजकारणाचा पुरस्कार यशवंतरावांनी केला होता ते सुसंस्कृत राजकारण करीत सामान्यांना, शेतक-यांना तसेच वंचितांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. तिच प्रेरणा मी या ठिकाणाहून घेऊन जातोय.’ यावेळी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन यात्रेनंतर मुख्यमंत्री थेट विमानतळाकडे रवाना झाले. तेथून त्यांनी विमानाने वाळव्याला प्रस्थान केले. 

स्मृतिस्थळी राजकीय प्रश्न नकोत!यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस लोकांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठाकडे येत असताना वाटेत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शेतकरी कर्जमाफीसारखे राजकीय प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी कोणतेही राजकीय प्रश्न नकोत,’ असे म्हणत या प्रश्नांना बगल दिली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाFarmerशेतकरी