शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परिवर्तनाची प्रेरणा मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:04 IST

‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

क-हाड - ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘एफआरपी लागू करून शेतक-यांना चांगला ऊसदर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहेच. शिवाय शुक्रवारीच १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी एवढी कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशातील उत्तुंग नेतृत्व आणि ज्यांनी ख-या अर्थाने महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. 

यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले. तसेच महाराष्ट्रात राहणा-या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तनाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचं सरकार काम करीत आहे. आणि मला विश्वास आहे, ज्या सुसंस्कृत राजकारणाचा पुरस्कार यशवंतरावांनी केला होता ते सुसंस्कृत राजकारण करीत सामान्यांना, शेतक-यांना तसेच वंचितांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. तिच प्रेरणा मी या ठिकाणाहून घेऊन जातोय.’ यावेळी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन यात्रेनंतर मुख्यमंत्री थेट विमानतळाकडे रवाना झाले. तेथून त्यांनी विमानाने वाळव्याला प्रस्थान केले. 

स्मृतिस्थळी राजकीय प्रश्न नकोत!यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस लोकांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठाकडे येत असताना वाटेत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शेतकरी कर्जमाफीसारखे राजकीय प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी कोणतेही राजकीय प्रश्न नकोत,’ असे म्हणत या प्रश्नांना बगल दिली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाFarmerशेतकरी