शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

परिवर्तनाची प्रेरणा मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:04 IST

‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

क-हाड - ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना सत्यात उतरविता आलेलं नाही. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करीत आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन करण्याची प्रेरणा आम्हाला मिळावी, म्हणून आज यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी नतमस्तक झालो आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘एफआरपी लागू करून शेतक-यांना चांगला ऊसदर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहेच. शिवाय शुक्रवारीच १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी एवढी कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशातील उत्तुंग नेतृत्व आणि ज्यांनी ख-या अर्थाने महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. 

यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले. तसेच महाराष्ट्रात राहणा-या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तनाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचं सरकार काम करीत आहे. आणि मला विश्वास आहे, ज्या सुसंस्कृत राजकारणाचा पुरस्कार यशवंतरावांनी केला होता ते सुसंस्कृत राजकारण करीत सामान्यांना, शेतक-यांना तसेच वंचितांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. तिच प्रेरणा मी या ठिकाणाहून घेऊन जातोय.’ यावेळी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन यात्रेनंतर मुख्यमंत्री थेट विमानतळाकडे रवाना झाले. तेथून त्यांनी विमानाने वाळव्याला प्रस्थान केले. 

स्मृतिस्थळी राजकीय प्रश्न नकोत!यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस लोकांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठाकडे येत असताना वाटेत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शेतकरी कर्जमाफीसारखे राजकीय प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी कोणतेही राजकीय प्रश्न नकोत,’ असे म्हणत या प्रश्नांना बगल दिली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाFarmerशेतकरी