शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

खटाव तालुक्यातील नऊपैकी सहा तलावांत पाण्याचा मृतसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसेगाव : जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी पूर्वेला असल्याने खटाव तालुक्यात मात्र अद्यापही मुसळधार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुसेगाव : जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी पूर्वेला असल्याने खटाव तालुक्यात मात्र अद्यापही मुसळधार पावसाची आवश्यकता जाणवू लागली आहे. तालुक्यातील नऊ तलावांपैकी सहा तलाव पाण्याविना कोरडेच आहेत तर इतर तीन तलावांत थोडाफार पाणी साठा झाला आहे.

तालुक्याच्या उत्तर भागासह अनेक गावांना वरदान असणाऱ्या नेर तलावातील केवळ ३५ टक्के म्हणजे १४५.१४ दशलक्ष घनफूट, दरुज तलावात १६.९५ दलघफू, तर मायणी तलावात ५१.५५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आजमितीला झाला आहे. तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या तलावांत केवळ पाण्याचा मृतसाठा आहे. खटाव तालुक्यात एकूण नऊ तलाव आहेत. ब्रिटिशकालीन वास्तू शिल्पाचा उत्कृष्ट नमुना असणारा नेर हा मध्यम स्वरुपाचा तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता ४१६.२० दशलक्ष घनफूट इतकी आहे तर इतर ८ लघुप्रकल्प आहेत.

खटाव तालुका अवर्षणप्रवण क्षेत्र असून, या भागात पर्जन्यमान अत्यंत कमी व बेभरवशाचे असते. येथील शेती निसर्गाच्या लहरीपणाची सातत्याने शिकार होत असते. बऱ्याच वर्षांपासून खटाव तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम राहिले आहे. जिहे-कठापूर योजना लवकर कार्यान्वित झाल्यास संपूर्ण तालुक्याला त्याचा फायदा होणार आहे. मात्र, शासनाच्या लालफितीच्या कारभाराची वाट पाहत येथील जनतेला बसावे लागत आहे. दिवसेंदिवस नेर तलावातील पाणी साठ्यात कमालीची घट होत आहे. या तालुक्याचा तारणहार असलेला इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाच्या काळातील नेर तलावात पाऊस काळ चांगला तरच पाणीसाठा होऊन तलाव पूर्ण क्षमतेने भरू शकतो, ही आजची वस्तुस्थिती आहे. येरळा नदी वाहू लागल्यास तालुक्यातील इतर गावांनाही त्याचा फायदा होत असतो. नैसर्गिकरित्या सर्वच तलाव भरण्यासाठी या भागात मोठ्या पावसाची गरज आहे.

(चौकट..)

पाणीसाठवण क्षमता व घनफूट पुढीलप्रमाणे..

दरूज (१०९.८८३) येळीव (७९.९७) शिरसवडी (६८.१३) मायणी (५९.४५) कानकात्रेवाडी (४३.०८) सातेवाडी (३७.३७), डाबेवाडी (२७.२२४), तर पारगाव तलावाची पाणीसाठवण क्षमता ३८.४७ द.ल.घ.फू इतकी आहे. सध्या यापैकी केवळ नेर व दरुज तलावात आजमितीला अनुक्रमे ३५ टक्के व १० टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, टेंभू योजनेचे सलग १६ दिवस पाणी आल्याने मायणी तलाव भरला आहे. तर बाकीच्या सर्व तलावात मृतसाठा शिल्लक राहिला असून, तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.

फोटो-

ब्रिटिशकालीन वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या खटाव तालुक्यातील नेर तलावात आजमितीला केवळ ३५ टक्के इतकाच पाणीसाठा आला आहे.