शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

corona virus : छातीत धाकधूक; काम बिनचूक !,झेडपीच्या २९० कर्मचाऱ्यांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:08 IST

नितीन काळेल सातारा : मिनीमंत्रालय समजणाऱ्या  जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे एक-एक विभाग बंद ठेवावा लागतोय. ...

ठळक मुद्दे छातीत धाकधूक; काम बिनचूक !,झेडपीच्या २९० कर्मचाऱ्यांना बाधानागरिकांच्या वर्दळीमुळे कोरोना जवळच; कार्यालयात पाऊल भीती घेऊनच

नितीन काळेलसातारा : मिनीमंत्रालय समजणाऱ्या जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे एक-एक विभाग बंद ठेवावा लागतोय. त्यातच छातीत धाकधूक ठेवूनच कर्मचाऱ्यांना फाईलींचा निपटाराही करावा लागतोय. दुसरीकडे नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोना जवळच बागडत असल्याचे वास्तवही समोर आलंय. अशामुळेच आतार्पंत झेडपीकडील २९० कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय !जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा परिषदेत मात्र, जुलै महिन्यात कोरोना शिरकाव झाला. एका पदाधिकाऱ्यांला आणि अन्य एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला. त्यानंतर कोरोनाचा हा सिलसिला सतत सुरू राहिला.

गेल्या दीड महिन्यात तर सतत आज या विभागात तर त्यानंतर दुसऱ्या विभागात रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारीही बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत झेडपीकडील २९० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा स्पर्श झालाय.सातारा जिल्हा परिषद इमारतीत तर कोरोनाने चांगलाच शिरकाव केलाय. अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे संबंधित विभाग काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतोय. त्या कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात येते.

ऐवढेच नाही तर त्या विभागात संपर्कात असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचीच चाचणी करण्यात येते. अशाचप्रकारे बुधवारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान विभागात एक-दोन नाही तर चौघेजण बाधित सापडले. त्यामुळे आख्खा विभागच बंद करण्यात आलाय. कार्यालयाला कुलुपच लावलंय.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील वस्तूस्थिती पाहिल्यावर अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या सावटातच काम करताना दिसत आहेत. आपल्या समोरील काम कसे होईल, हे सर्वांकडून पाहिले जात होते. पण, मनात कोठेतरी भीती दिसून येत होती. याबाबत काहींनी तर कोरोनाला बरोबर घेऊनच आम्ही कामे करतो, अशी स्पष्टता दिली.

याला कारण, म्हणजे आजही जिल्हा परिषदेत अनेक नागरिक कामे घेऊन येत आहेत. त्यामुळे बांधकामसारख्या विभागात गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगही या नागरिकांकडून पाळण्यात येत नाही. त्यामुळे नागरिक अवतीभवती वावरत असतानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा तसेच कामे करावी लागत आहेत.

प्रशासनाने नागरिकांना अति महत्वाचे काम असेल तरच येण्याचे आवाहन केले आहे. पण, याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याचे वास्तवही समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढत आहे.आतापर्यंत या विभागात रुग्ण आढळले...अर्थ, बांधकाम, आरोग्य, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, रोजगार हमी योजना, समाजकल्याण विभाग. जिल्ह्यातील काही पंचायत समितीत.

वादाचे प्रसंग निर्माण...जिल्हा परिषद इमारतीच्या मुख्य दरवाज्याजवळ टेबल ठेवण्यात आलेला आहे. तेथे नागरिकांची पत्रे, निवेदन घेण्याची व्यवस्था आहे. पण, नागरिक थेट विभागात जात आहेत. कर्मचाऱ्यांनी विचारणा केली तर नागरिकांकडून वादही घातला जातो. काहीजण तर थेट नेत्यांना कॉल करुन कार्यालयात सोडण्यासाठी गळ घालत असतात.

कोरोना काळात प्रशासन चिकाटीने काम करत आहे. नागरिकांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच जिल्हा परिषदेत यावे. अर्ज, निवेदने मेलवर पाठवली तरी त्यांचे प्रश्न सुटू शकतात.- मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)

जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू ठेवण्याबाबत संघटनांच्या वतीने अधिकाऱ्यांना भेटलो. प्रकृतीचा त्रास होत असेल अशा कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी.- काका पाटील, जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर