शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लागला वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील ...

सातारा : जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आतातर कोरोनाचा कहर सुरू आहे.

0000000\

वीज सतत खंडित

सातारा : सातारा शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. सातारा शहरातील काही भागातील वीजपुरवठा सायंकाळच्या सुमारास दोन ते तीनवेळा खंडित झाला. उन्हामुळे उकाडा वाढला असून, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागतो.

000

सवयभानचा विसर

सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करुन दिली जात होती. पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.

0000

रस्त्यावर वाहनतळ

सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.

000000

चौकात शतपावली

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून, एकमेकांना दोष दिला जात आहे. पण त्याचवेळी दररोज रात्री अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये शतपावली करण्यासाठी जमत असतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

00000

जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली

सातारा : मार्चअखेर असल्याने जिल्हा परिषदेत गर्दी वाढू लागली आहे. कोरोना काळात कोणीही शासकीय कार्यालयात येऊ नये, असे अपेक्षित आहे. तरीही विविध कामांच्या निमित्ताने लोक जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये येत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कर्मचारी त्यांना नंतर येण्यास सांगतात.

000000

सोसायट्यांमध्ये वावर

सातारा : असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तरी विचारणा होत नाही. पण काही सोसायटीत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

000000

वीजबिलाची चिंता

सातारा : ग्रामीण भागात वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, कर्तव्य कसे पार पाडायचे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. आता पुन्हा लॉकडाऊन केले असल्याने नागरिक वीजबिल माफ होण्याची वाट पाहत आहेत.